Kolhapur News : नैसर्गिक आपत्ती याबरोबरच नदीकाठी घेत असलेल्या पिकांच्या उत्पादनावर हुमणी व अन्य कीड-रोगांमुळे परिणाम होत आहे. अशा स्थितीत पर्यायी पिकांची निवड करून आपली शेतीची उत्पादकता कशा पद्धतीने वाढवता येईल याचा अभ्यास करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम आणि आरोग्य समिती सभापती व माजी संचालक सर्जेराव पाटील यांनी वालूर येथे केले.
वालूर येथील प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी दिलीप सबनीस व युवा शेतकरी ओंकार दिलीप सबनीस यांनी वालूर येथे त्यांच्या शेतावर केलेल्या टूलडा जातीच्या बांबू उत्पादन तोडणीचा प्रारंभ श्री. पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
बांबू बोर्ड समन्वयक अजित भोसले म्हणाले, की शाहूवाडी तालुक्याच्या दुर्गम नापीक जमिनीमध्ये ही लागवड यशस्वी होत आहे. पाऊस व अन्य कीड-रोग यापासून सुरक्षित व हमखास हमीभाव देणारी बांबू लागवड यशस्वी होत आहे.
प्रगतिशील व प्रयोगशील शेतकरी दिलीप सबनीस यांनी स्वतःच्या नदीकाठी असणाऱ्या जमिनीमध्ये बांबूलागवड करून इतर शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
या बांबू शेतीला भेट देऊन शेतकरी बांधवांनी आपल्या परिसरातील बांबूलागवड करावी यासाठी केंद्र शासनाच्या वतीने विविध योजनादेखील आहेत याचा लाभ घ्यावा.
या वेळी राजू केसरे, विरळेचे सरपंच सुरेश पाटील, मारुती गुरुव, राजाराम विरळे, यशवंत पाटील, आदींसह शेतकरी उपस्थित होते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.