Agriculture Productivity : कापूस, सोयाबीन उत्पादकता वाढणार

Kharif Season : राज्याच्या खरीप हंगामाचे नेतृत्व करणाऱ्या कापूस व सोयाबीनकडून यंदा चांगल्या उत्पादनाची अपेक्षा आहे. यंदा दोन्ही पिकांची उत्पादकता वाढण्यास वाव आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
Agriculture
Agriculture Agrowon
Published on
Updated on

Pune News : राज्याच्या खरीप हंगामाचे नेतृत्व करणाऱ्या कापूस व सोयाबीनकडून यंदा चांगल्या उत्पादनाची अपेक्षा आहे. यंदा दोन्ही पिकांची उत्पादकता वाढण्यास वाव आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान राज्याच्या काही भागांत अतिपावसाने शेतांतील सखल भागात पाणी साचले असून, पिके पिवळी पडून नुकसान होऊ लागल्याची स्थिती आहे.

राज्यात २०१७ पासून होत असलेला सोयाबीन पेरा पाहिल्यास सरासरी क्षेत्र कायम ४१ लाख हेक्टर इतके राहिलेले आहे. हाच पेरा यंदा मात्र शेतकऱ्यांनी १० लाख हेक्टरने वाढवून ५० लाख हेक्टरपर्यंत नेला आहे.

Agriculture
Soybean Farming : खेडमध्ये सोयाबीनला शेतकऱ्यांची पसंती

राज्याचे कपाशीचे पाच वर्षांपासूनचे सरासरी क्षेत्र ४२ लाख हेक्टरपर्यंत गेले होते. मात्र काही भागांत शेतकरी कपाशीकडून सोयाबीनकडे वळले. त्यामुळे गेल्या हंगामात कपाशीची लागवड घटून ४० लाख हेक्टरच्या आसपास झाली. यंदा क्षेत्र अजून कमी होईल, असा अंदाज होता. परंतु चांगल्या पावसामुळे कपाशीचे क्षेत्र यंदा फारसे वाढणार नसले तरी कमीदेखील होणार नाही, असे आता स्पष्ट झाले आहे.

सोयाबीनचे पीक आता फांद्या फुटणे, शाखीय वाढ ते फुलोरा स्थितीत पोहोचले आहे. तर कपाशी आता विदर्भ, मराठवाड्यात उगवण, रोपे ते वाढीच्या अवस्थेत आहे. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, कपाशी उत्तम स्थितीत असली, तरी शेतकरी व जिनिंगचालकांनी गुलाबी बोंड अळीपासून पिकांची काळजी घ्यायला हवी. जिनिंग परिसरात आधीची सरकी काढून टाकणे तसेच स्वच्छता ठेवल्यास बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळता येईल.

Agriculture
Agriculture Production : उत्पादनवाढीतून साधली उत्पन्नामध्ये वाढ

अतिवृष्टी किंवा काढणीवेळी पाऊस, असे दोन धोके आता सोयाबीन व कपाशीसमोर आहेत. गेल्या हंगामात शेतकऱ्यांनी ६६ लाख टन सोयाबीन पिकविले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोयाबीनची उत्पादकता प्रतिहेक्टरी १२९९ किलोवरून १४१३ किलोच्या पुढे जाऊ शकते. तसे झाल्यास राज्यातील एकूण सोयाबीन उत्पादन यंदा ७२ लाख टनांच्या पुढे जाण्यास वाव आहे, असे कृषी विभागाला वाटते.

कपाशीचे उत्पादनदेखील यंदा ८८ लाख गाठींवरुन ९२ लाख गाठींच्या पुढे (प्रतिगाठ १७० किलो) जाण्याची चिन्हे आहेत. गेल्या हंगामात शेतकऱ्यांना कपाशीची सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टरी ३५५ किलो मिळाली होती. काढणीपर्यंत अनुकूल हवामान राहिल्यास कपाशीची उत्पादकता यंदा ४० ते ५० किलोने वाढेल. शेतकऱ्यांना यंदा प्रतिहेक्टरी ४०० किलोच्या आसपास कपाशी मिळू शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे.

राज्याच्या कापूस, सोयाबीन पट्ट्यात यंदा सुरुवातीपासून मॉन्सून साथ देतो आहे. सध्या दोन्ही पिकांची वाढ जोमाने चालू आहे. यापुढे अतिपाऊस न झाल्यास या दोन्ही मुख्य पिके यंदा चांगले उत्पादन देतील, अशी अपेक्षा आहे
विनयकुमार आवटे, कृषी संचालक, विस्तार व प्रशिक्षण विभाग

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com