Cyclone Remal Kolhapur Agrowon
ॲग्रो विशेष

Cyclone Remal Kolhapur : कोल्हापुरात पुढचे तीन दिवस पावसाचे, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय

Rain In Kolhapur : महाराष्ट्रात काही ठिकाणी उष्णेतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे तर काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

sandeep Shirguppe

Bay Of Bengal Cyclone : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने रेमल वादळाने धुमाकूळ घातलं आहे. दरम्यान याचा परिणाम अनेक राज्यात होत आहे महाराष्ट्रात काही ठिकाणी उष्णेतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे तर काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात चक्रिवादळाचा परिणाम काही अंशी दिसून आला मागच्या २४ तासांत दिवसभर वातावरण ढगाळ होते. अनेक भागात दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. तर काही ठिकाणी रिमझिम पावसाच्या सरी कोसळल्या.

अचानक तापमान कमी झाल्याने उष्णतेपासून दिलासा मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत होते तर ढगाळ वातावरण झाल्याने शेतकऱ्यांनी खरिपाचा हंगाम साधण्यासाठी बैल आणि यंत्राच्या साहाय्याने मशागतीच्या कामासाठी लगबग सुरू केली आहे.

सरासरी तापमानात ४.६ अंशांनी घट झाल्याने पारा ३०.१ अंशांपर्यंत घसरला. कमी झालेले तापमान आणि वारे यामुळे दिवसभर पावसाळी वातावरण होते. बुधवारपासून तीन दिवस मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज आहे व्यक्त करण्यात आला आहे.

मागच्या आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने सात दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरण ढगाळ होत आहे. ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस होत आहे. परिणामी सात दिवसांपूर्वी ३६.२ अंशांवर असलेला पारा घसरतच चालला आहे.

सोमवारी तर सकाळपासूनच वातावरण ढगाळ होते. यामुळे सरासरी तापमानापेक्षा ४.६ अंशांनी कमी कमाल तापमानाची नोंद झाली सकाळपासून हवेतील आर्द्रतेचे प्रमाण अधिक होते दिवसभर त्यात फारसा बदल झाला नाही.

दरम्यान जिल्ह्यातील हवेतील प्रदुषण पातळीही खालावली होती. काल दिवसभर ढगाळ वातावरण राहिले परंतु पावसाने हुलकावणी दिली. आज मंगळवारीही वातावरण ढगाळच राहील. यानंतर बुधवार ते शुक्रवारपर्यंत जिल्ह्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस होईल, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

उष्णतेच्या लाटेचाही इशारा

राज्यात उष्णतेची लाट अतितीव्र झाली आहे. आगामी तीन दिवसांत विदर्भाचा पारा ४८ अंशांवर जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यवतमाळ, चंद्रपूर, अकोला या तीन शहरांना उष्णतेचा ऑरेंज, तर मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर, हिंगोली, लातूर, नांदेड, बीड, अहमदनगर, धाराशिव या शहरांना येलो अलर्ट दिला आहे.

रेमल चक्रिवादळाचा परिणाम

रेमल चक्रीवादळाची स्थिती अरबी समुद्र, बंगालचा उपसागरात प्रभाव वाढल्याने आणि पश्चिमेकडील वाऱ्याच्या पॅटर्न बदलला आहे. वाऱ्यातील आर्द्रता चक्रीवादळाने खेचून घेतल्यामुळे राज्यात उष्णतेची लाट सक्रिय झाली आहे. चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासह छत्तीसगड, मध्य प्रदेशात उष्णतेची लाट, तर पूर्वोत्तर भारतात महाराष्ट्राआधी मान्सून लवकर सक्रिय होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून माहिती देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Article: माचीवरला शंकर...

Saptashrungi Devi Darshan: सप्तशृंगीमातेचे मध्यरात्रीपर्यंत मिळणार दर्शन

Model Village: भेंड गावानं बांधलं प्रगतीचं, विकासाचं तोरण !

Agrowon Diwali Article: अवघाचि संसार सुखाचा करीन

NITI Aayog: देशातील समुद्री मासेमारीच्या विकासासाठी नीती आयोगाचा अहवाल; स्वतंत्र योजना आणि धोरणांची शिफारस

SCROLL FOR NEXT