Rabi Season Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Season : कमी पावसामुळे रब्बी हंगामावर टांगती तलवार

Team Agrowon

Akola News : यंदाच्या मोसमात कमी पाऊस झाल्याने आगामी रब्बी हंगामावर टांगती तलवार निर्माण झाली आहे. जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने नियोजित लागवड क्षेत्राबाबत यंत्रणास्तरावरही आता साशंकता व्यक्त होऊ लागली आहे.

या महिनाभरात परतीचा काही पाऊस झाला तर लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल राहू शकतो असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तिनही जिल्ह्यांत जून ते सप्टेंबर या काळात सरासरीएवढाही पाऊस झालेला नाही.

मागील काही वर्षात रब्बी लागवडीवर शेतकरी जोर देत आहेत. खरिपात होणारे नुकसान या हंगामाच्या आधारे काही अंशी भरून काढण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न राहतो. त्यामुळे या तिनही जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र सुमारे साडेचार लाख हेक्टरपेक्षा अधिक राहते. नेहमी सरासरीपर्यंत लागवड होत आलेली आहे.

यंदाच्या खरिपातही सोयाबीन या प्रमुख पिकाचे नुकसान झाल्याने रब्बीतून हा तोटा भरून काढण्यासाठी शेतकरी नियोजन करीत आहेत. मात्र, जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने पेरणीला ही अडचण ठरू शकते.

ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा आहे, अशा शेतकऱ्यांना सरंक्षित पाणी देऊन रब्बी साधताही येईल. या भागात रब्बीत बहुतांश क्षेत्र हे कोरडवाहू स्वरूपाचे आहे. यंदा पावसाळ्याच्या चार महिन्यातच अद्याप ओलांडली गेलेली नाही. पुढील काळात येणारा पाऊस रब्बीसाठी दिलासा देणारा असेल.

जून ते सप्टेंबर दरम्यान झालेला पाऊस

जिल्हा सरासरी प्रत्यक्ष झालेला पाऊस टक्के

अकोला ६९३.७ ५०३.७ ७२.६

बुलडाणा ६५९ ५७६ ८७.४

वाशीम ७८९ ६७०.८ ८५.००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT