Radhakrishna Vikhe Patil Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : संत्रा-सोयाबीन उत्पादकांना भरपाईचा प्रस्ताव ः विखे

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : नागपूर व आसपासच्या परिसरात ढगफुटी सदृश पाऊस होता. सोयाबीन व संत्रा पिकावरची कीडही गंभीर आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना निर्धारितसोबतच वाढीव मोबदला देण्याबाबत शासन पंचनाम्यांच्या अहवालानंतर निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी (ता. ८) केले.

अकोला, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यांतील चिमूर भागात नुकसानाची पाहणी केल्यानंतर नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात बचत भवनात सायंकाळी त्यांनी आढावा घेतला. आढावा बैठकीत पंचनाम्यांचे राहिलेले काम तातडीने पूर्ण करून अहवाल पाठविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

या बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जायसवाल, आमदार टेकचंद सावरकर, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. या वेळी जीवितहानी, घरांचे, शेती पिकांचे, रस्त्यांचे, झालेल्या नुकसानाचे अधिकाऱ्यांनी माहिती सादर केली.

राज्य शासनाने रेती व्यवहारात यापूर्वी सुरू असणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी नवे धोरण आणले होते. शासनाचा याबाबतचा उद्देश स्पष्ट होता. मात्र सुरुवातीच्या काळानंतर सध्याच्या टप्प्यात धोरणात काही बदल करावे लागू शकतात. त्यामुळे योजनेचा शासन फेरआढावा घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्याला एक रुपयामध्ये पीकविमा देण्याच्या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना आपत्कालीन परिस्थितीमध्ये उपयोगी ठरल्याचे पुढे आले आहे. महाराष्ट्राच्या अनेक दुर्गम भागात शेतकऱ्यांना या पीकविम्याचा लाभ विपरित परिस्थितीत होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या योजनेला दीर्घकाळासाठी नियोजनबद्धरीत्या अमलात आणावे, अशी सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली.

या वेळी सेतू केंद्राच्या माध्यमातून सामान्य माणसाला सुविधा मिळताना कोणताही गैरव्यवहार होणार नाही, अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या कोणत्याही नागरिकाला अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही, याकडे कटाक्षाने लक्ष वेधण्याचे त्यांनी सांगितले. या सोबतच वाढता ताण लक्षात घेता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयांमध्येच सेतू केंद्र सुरू करण्याचे शासनाच्या विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले.

नागपूर मध्ये २३ सप्टेंबर रोजी झालेल्या ढगफुटी सदृश पावसानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी यापूर्वी नुकसानाची पाहणी केली आहे. गेली दोन दिवस महसूलमंत्र्यांनीदेखील पाहणी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT