Prime Minister Narendra Modi  Agrowon
ॲग्रो विशेष

Prime Minister Narendra Modi : मागील १० वर्षात आम्ही देशाचा नवा पाया घातला : पंतप्रधान मोदी

Aslam Abdul Shanedivan

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (ता.२८) पीएम किसान सन्मान निधीचा १६ वा हप्ता आज जारी केला. त्यांनी यावेळी पीएम किसान सन्मान निधीची २१ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात हस्तांतरित केली. तसेच महाराष्ट्रातील रेल्वे, रस्ते आणि सिंचनाशी संबंधित पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन केले. यावेळी यवतमाळ जिल्ह्यातील डोरली येथील कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी, काँग्रेससह शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच, 'या १० वर्षात' आम्ही देशाच्या विकासाचा नवा पाया घातला, असेही मोदी म्हणाले.

मोदी म्हणाले, "१० वर्षांपूर्वी चाय पर चर्चा करायला यवतमाळमध्ये आलो होतो. त्यावेळी लोकांनी प्रचंड प्रेम दिले. त्यावेळी आम्ही ३०० पार झालो. २०१९ मध्ये जनतेने ३५० पार केले आणि आता २०२४ मध्ये देशात एकच आवाज आहे, अब की बार ४०० पार,"

तसेच पुढे ते म्हणाले, "देशाच्या प्रत्येक कोपऱ्याला विकसित बनवण्याचं माझ स्वप्न असून प्राधान्याने गरीब, युवा, शेतकरी, महिला यांना सशक्त करण्याचे काम केले जात आहे. हे चार घटक सशक्त झाले तर देश विकसित होईल," असे मोदी म्हणाले.

विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या रेल्वे कनेक्टिव्हिटी निर्माण झाल्यावरून मोदींनी यूपीए सरकार आणि तत्कालिन कृषी मंत्री शरद पवार यांच्यावर टीका केली. मोदी म्हणाले, "जेव्हा दिल्लीतून शेतकऱ्यांसाठी निधी दिला जायचा त्यावेळी शेतकऱ्यांच्या हाती पैसे जात नव्हता. त्यात लूट व्हायची. गावे, गरीब, शेतकरी, आदिवासी यांना काहीही मिळाले नाही, पण आता मी एक बटण दाबले आणि लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात २१ हजार कोटी एवढी मोठी रक्कम जमा झाली. हीच तर मोदीची गॅरंटी आहे" असेही मोदी म्हणाले. पुढे त्यांनी काँग्रेसवरही टीका केली. "हेच जर आता काँग्रेसचे शासन असते तर २१ हजार कोटींपैकी १८ हजार कोटीच पोच झाले असते," असा टोला ही मोदी यांनी काँग्रेसला लगावला आहे.

महाराष्ट्रावर मोदींचे प्रेम

मागील दशकात आमच्या देशासाठी स्वर्णकाळ राहिला असून त्याचे शिल्पकार मोदीच आहेत, असे गौरवद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. आपल्या देशात महिला, शेतकरी, गरीब आणि तरुण या चारच जाती आहेत, असे आपले पंतप्रधान मोदी वारंवार सांगतात. पंतप्रधान मोदींनी गेल्या १० वर्षांत समाजाच्या या चार स्तंभांना पुरेशी ताकद देण्याचे काम केले आहे. आम्ही पंतप्रधान मोदींनी दाखवलेल्या मार्गावर चालत असून गेल्या १० वर्षात पंतप्रधान मोदींनी देशाला स्वावलंबी बनवल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

महिलांना घराचा संयुक्त मालकी हक्क

या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, साडे पाच लाख बचत गटांना फिरता निधी म्हणून कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही म्हटले आहे. 'पंतप्रधान मोदी म्हणतात तसे गरीब, शेतकरी, युवा आणि महिला या चारच जाती आहेत. ज्यांना आज मदत मिळत आहे, असा दावाही फडणवीसांनी केला.तसेच शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत ४ हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असून मोदी आवास योजनेतील घरांमध्ये महिलांना घराचा संयुक्त मालकी हक्क मिळेल असेही फडणवीस म्हणाले.

अजित पवारांकडून मोदींचं कौतुक

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून मोदींचं कौतुक करण्यात आले. अजित पवार म्हणाले, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून महिलांसाठी अनेक योजना सुरू करण्यात आल्या. तर महिलांच्या सक्ष्मीकरणासाठी महिला बचत गटांना हजारो कोटींचे भांडवल आणि हजारो कोटींचे कर्ज देण्यात आले आहे. देशाची अर्थव्यवस्था ही ५ ट्रिलियन डॉलरवर नेण्याचे पंतप्रधान मोदींचे लक्ष्य असून त्यासाठी राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलरवर नेण्याचे आमचे लक्ष्य असल्याचे अजित पवार म्हणाले. तर देशाच्या आर्थिक विकासात योगदान देण्यासाठी आपण महिला सक्षमीकरणावर भर देणे आवश्यक असल्याचेही अजित पवार म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत नियमबाह्य सहभागाबाबत कारवाईसत्र

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

SCROLL FOR NEXT