Nagar News : नगर जिल्ह्यातील धरणे तसेच साठवण तलावातील पाण्याची उपलब्धता लक्षात घेता संभाव्य टंचाईसदृश परिस्थितीच्या अनुषंगाने टंचाई निवारणाच्या उपाययोजनांचा आराखडा तयार करा. कोणताही भाग टंचाई निवारणापासून वंचित राहणार याची काळजी घ्यावी अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
नगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात टंचाईच्या परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांच्या अनुषंगाने आढावा बैठक झाली. दूरदृश्य प्रणालीद्वारे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व तसेच जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
संभाव्य टंचाईसदृश्य परिस्थितीमध्ये नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागू नये याची खबरदारी घेत जिल्ह्यातील प्रत्येक वाडी, वस्त्यांमध्ये पाणी मिळेल यादृष्टीने पाणी पुरवठ्याचे काटेकोर नियोजन करण्यात यावे. पाणी पुरवठ्यासाठी पाणी उद्भवाचा सर्व्हे करून ते निश्चित करण्यात यावेत.
उद्भवातून पाणी उपसा करण्यासाठी आवश्यक त्या सर्व साधनांची उपलब्धता ठेवा. टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठीची निविदा प्रक्रिया गतीने राबवून ती अंतिम करण्यात यावी. टँकरद्वारे पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या ठिकाणी पाच हजार लिटरच्या टाक्यांची व्यवस्था करण्यात यावी. जिल्ह्यातील ज्या पाणीपुरवठा योजनांची कामे रखडलेली असतील ती कामे प्राधान्याने व गतीने पूर्ण करण्यात यावेत.
संभाव्य टंचाईसदृश्य परिस्थितीमध्ये जनावरांना मुबलक प्रमाणात चारा मिळेल यादृष्टीने चाऱ्याचेही नियोजन करण्यात यावे. जिल्ह्यात मागेल त्याला काम मिळण्यासाठी रोजगार हमी योजनेमध्ये सेल्फवर मोठ्या प्रमाणात कामे मंजूर करून ठेवण्यात यावीत. वीजजोडणी खंडित करण्यात येऊ नये असे सांगण्यात आले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.