Monsoon Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Pre-Monsoon Rain : धाराशीव, धुळे, नाशिकसह जालन्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा; नाशिकची ७० ते ८० गावं अंधारात

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यात मॉन्सूनचे आगमन झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रासह नांदेडच्या वेशीपर्यंत मॉन्सून पोहचला असून राज्याच्या उर्वरीत जिल्ह्यांमध्ये सध्या मॉन्सून पूर्व पावसाने धुमाकूळ घातला आहे. धाराशीव, धुळे, नाशिकसह जालन्यात रविवारी (ता.०९) मॉन्सून पूर्व पावसाने जोरदार तडाखा दिला असून मोठे नुकसान झाले आहे. धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यासह पावसामुळे ज्वारीचे पोती भीजली. तर नाशिकमधील एकलहरे औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मर फुटल्याने त्याचा फटका ७० ते ८० गावांना बसला आहे. या गावांमध्ये मध्यरात्रीपासून वीज पुरवठा झाला असून सध्या ट्रान्सफार्मर दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालय पाण्यात

रविवारी झालेल्या वादळी पावसामुळे येथील फकीरा नगर भागात पाणी शिरले. त्यामुळे ज्वारी भरून ठेवलेली पोती पाण्यात गेल्याने धान्याचे मोठे नुकसान झाले. तसेच मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाचा फटका जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयास देखील बसला. कार्यालयात पावसाचे पाणी शिरल्याने कार्यालयातील इलेक्ट्रॉनिक बोट, दोरखंड व इतर महत्वाचे साहित्य भिजले. तर मुसळधार पावसामुळे बहुतांश भागातील पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला.

जालन्यात घरावरील पत्रे उडाली

मॉन्सूनच्या सुखद आगमनाच्या पहिल्याच पावसात विविध जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान होत आहे. दरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि मुसळधार पावसाने जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात हैदोस घातला. येथील वडाळा गावातील अनेक घरांवरील पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर पावसाळ्याच्या तोंडावर डोक्यावरील छत नाहीसे होत घरांची पडझड झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. त्यामुळे शासनाने लवकर पंचनामा करून मदत करावी अशी मागणी नुकसानग्रस्त कुटुंबांयांनी केली आहे.

नाशिकच्या ८० गावांचा वीज पुरवठा खंडित

दरम्यान मुसळधार पावसाचा फटका एकलहरे औष्णिक वीजनिर्मिती केंद्राला देखील बसला. येथे मुसळधार पावसामुळे वीजनिर्मिती केंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मर जळाला. त्यामुळे नाशिक शहरासह ७० ते ८० गावांना होणार वीजपुरवठा खंडीत झाला. नाशिक शहरासह परिसराला रविवारी धुवाँधार पावसाने झोडपून काढले. यावेळी एकलहरे औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील महापारेषणचा पॉवर ट्रान्सफॉर्मर जळाला. त्यामुळे १३२ केव्ही सबस्टेशनमधून होणारा वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे नाशिक शहरातील काही भागासह ७० ते ८० गावांना अंधारात रात्र काढावी लागली आहे. आता महापारेषणकडून ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

धुळ्यात वीजपडून कांदा खाक

धुळ्यात देखील गेली दोन ते तीन दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. शिंदखेडा तालुक्यातील जोरदार पाऊस झाला. यादरम्यान येथील आरावे शिवारात वीज कोसळून चाळीत ठेवलेला कांदा संपूर्ण जळून खाक झाला. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याला भाव नाही. यामुळे नाशिकसह अनेक शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला. यादरम्यान शिंदखेडा तालुक्यातील आरावे येथील शेतकरी बारकू गिरासे यांनी देखील कांदा चाळीत साठवून ठेवला होता. मात्र रविवारी त्यांच्या कांदा चाळीवर वीज कोसळली आणि संपूर्ण कांदा जळून खाक झाला. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेऊन नुकसान भरपाई अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्याने केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT