Pomegranate Agrowon
ॲग्रो विशेष

Pomegranate Production: हस्त बहरातील डाळिंब उत्पादनाला पावसाचा फटका; ३०% घटण्याची शक्यता!

Pomegranate Market : राज्यातील हस्त बहराला परतीच्या आणि मॉन्सूनोत्तर पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे सेटिंग न झाल्याने फूलगळ मोठ्या प्रमाणात झाली आहे. परिणामी फळांची संख्या कमी झाली असून हस्त बहरातील डाळिंबाचे उत्पादन ३० टक्क्यांनी घटणार असल्याचा प्राथमिक अंदाज डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News: राज्यातील हस्त बहराला परतीच्या आणि मॉन्सूनोत्तर पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे सेटिंग न झाल्याने फूलगळ मोठ्या प्रमाणात झाली आहे. परिणामी फळांची संख्या कमी झाली असून हस्त बहरातील डाळिंबाचे उत्पादन ३० टक्क्यांनी घटणार असल्याचा प्राथमिक अंदाज डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. बाजारात डाळिंबाची आवक कमी राहणार असून चांगले दर राहण्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे.

राज्यातील पश्चिम महाराष्ट्रासह नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यांसह अनेक भागांत हस्त बहर धरला जातो. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी नियोजनही केले होते. मात्र, सप्टेंबर ते नोव्हेंबर अखेर परतीचा आणि मॉन्सूनोत्तर पावसामुळे बहार धरण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागली. दरम्यानच्या काळात दिवसभर अतिउष्णता आणि रात्रीचे कमी तापमान कमी याचा फटकाही डाळिंब बागेला बसला. परिणामी ताण मिळाला नाही. त्यामुळे सेटिंग होण्यास अडचणी आल्या. तसेच फूलगळही मोठ्या प्रमाणात झाली.

दरम्यान, आगाप हस्त बहर धरलेले डाळिंब चांगले असून फळ संख्याही चांगली आहे. परंतु त्यानंतर म्हणजेच सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये धरलेल्या बागांना फूलगळ झाल्याने डाळिंबाला अपेक्षित फळसंख्या मिळाली नाही. त्यामुळे डाळिंबाच्या उत्पादनात सरासरी ३० टक्के घट होईल, असे सांगण्यात येत आहे. सध्या फळाचे वजन २०० ते २५० ग्रॅमचे आहे. पोषक वातावरण असल्याने डाळिंबावर रोगाचा प्रादुर्भाव फारसा दिसत नसल्याचे चित्र आहे.

नैसर्गिक संकटाच्या कचाट्यात मृग आणि हस्त या दोन्ही बहरांतील डाळिंब पीक सापडले. त्यामुळे मृग बहरातील डाळिंबाचे उत्पादनही कमीच राहिले. आता हस्त बहरातील डाळिंबाचे उत्पादन निम्‍म्यावर येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. वास्तविक पाहता, मार्चमध्ये विक्रीसाठी काढणी सुरू झाल्यानंतरच डाळिंबाचे उत्पादन कितीने कमी झाले हे स्पष्ट होईल.

आंबिया बहराचे क्षेत्र वाढण्याची शक्यता

राज्यात आंबिया बहर जानेवारी ते फेब्रुवारीअखेर धरला जातो. आंबिया बहराचे सर्वसाधारण क्षेत्र २० हजार हेक्टर इतके आहे. आजअखेर १२ हजार बहर धरला आहे. मात्र, ऑक्टोबरअखेर पाऊस असल्याने हस्त बहरातील डाळिंबाचे सेटिंग झाले नाही. त्यामुळे हस्त बहरातील शेतकरी आंबिया बहराकडे वळाले आहेत. त्यामुळे आंबिया बहराचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.

हस्त बहराला अति पावसाचे ग्रहण लागले. तसेच काही भागांत तापमानातील बदलाचा फटका डाळिंबाला बसला आहे. परिणामी ३० टक्क्यांनी उत्पादन घटेल असा प्राथमिक अंदाज आहे.
प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब संघ
पावसामुळे हस्त बहरातील डाळिंबाचे सेटिंग होण्यास अडथळे निर्माण झाले. त्यामुळे या बहरातील शेतकरी आंबिया बहराकडे वळाले आहेत. त्यामुळे आंबिया बहरातील क्षेत्र वाढेल, असे दिसते.
राहुल रसाळ, डाळिंब उत्पादक शेतकरी, निघोज, जि. अहिल्यानगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT