Solapur News: प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत रब्बी हंगामासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असताना शेतकऱ्यांचा प्रतिसाद मात्र अत्यंत कमी असल्याचे चित्र समोर आले आहे. ज्वारी पिकाची अर्ज भरायची मुदत ३० नोव्हेंबरला संपली असून,.गहू, हरभरा व कांदा पिकांसाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदत आहे. तरीही एक डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात केवळ ५४ हजार २९६ शेतकऱ्यांनीच पीकविमा भरला आहे.यंदा खरीपात जिल्ह्यात फक्त तीन लाख ३० हजार ७८६ शेतकऱ्यांनी विमा घेतला होता. .योजनेतील बदलांमुळे शेतकरी विम्यापासून दूर जात असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे.विमा हंगामात उंबरठा उत्पादनावर आधारित सुधारित घटक लागू केल्याने व नुकसान भरपाई प्रक्रियेत केलेल्या बदलांमुळे शेतकऱ्यांचा विमा भरण्याकडे कल कमी असल्याचे चित्रआहे..Rabi Crop Insurance: रब्बीतही द्या विमा संरक्षण.रब्बी हंगामात सहा पिकांना पीकविमा लागू आहे.कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी योजना ऐच्छिक असून जिल्ह्यातील अर्जांपैकी एक हजार १५९ कर्जदार, तर ५३ हजार १३७ बिगर कर्जदार शेतकरी आहेत. .Rabi Crop Insurance: रब्बी पीकविम्याचे १ लाख ४ हजारांवर अर्ज दाखल.या शेतकऱ्यांनी मिळून ३७ हजार १८९ हेक्टर क्षेत्राला संरक्षण घेतले आहे.गहू, हरभरा आणि कांद्याची अंतिम मुदत १५ डिसेंबरपर्यंत असल्याने पुढील काही दिवसांत .अर्जसंख्येत वाढ होण्याची शक्यता असली,तरी एकूण प्रतिसाद कमीचराहण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.