PM Kisan Agrowon
ॲग्रो विशेष

PM Kisan: किसान सन्मान नव्हे, अपमान योजना; पंजाबराव पाटील

Farmers Rights: देशात सरकारकडून शेतकऱ्यांना शेती उत्पादन खर्चासाठी अनुदान नाही, योग्य हमीभावही मिळत नाही. त्यामुळे कर्जबाजारी होऊन शेतकरी आत्महत्या करत आहेत.

Team Agrowon

Satara News: देशात सरकारकडून शेतकऱ्यांना शेती उत्पादन खर्चासाठी अनुदान नाही, योग्य हमीभावही मिळत नाही. त्यामुळे कर्जबाजारी होऊन शेतकरी आत्महत्या करत आहेत. येणाऱ्या काळात शेती व्यवस्था टिकेल का? हा शेतकऱ्यांपुढे प्रश्‍न आहे. पीएम किसान सन्मान योजना ही शेतकरी अपमान योजना असल्याची टीका बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक पंजाबराव पाटील यांनी व्यक्त केले.

टाळगाव येथे माध्यमांशी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांसाठी योजना आहेत, त्याची अंमलबजावणी होत नाही. एकेकाळी देशात उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी अशी अवस्था होती. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याचा शेतकऱ्यांना कोणताही फायदा मिळाला नाही. उलट स्थिती झाली.

पीएम किसान सन्मान योजना ही शेतकरी अपमान योजना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला. त्यानंतर दोन हजार रुपये मिळाल्यामुळे शेतीला खते, बियाणे, कीटकनाशके आणि शेतीच्या कामाला मदत मिळेल, असे मुलाखतीत सांगितले. या योजनेचे आता पोस्टमार्टेम करण्याची वेळ आली आहे.

सध्या पीएम किसान योजनेतून वर्षाला तीन वेळा दोन हजार रुपयांप्रमाणे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जात आहेत. सहा हजारांत सहा गुंठेही शेती करता येत नाही. एक गुंठा नांगरणीसाठी १५० रुपये, रोटर मारण्यासाठी १०० रुपये, पेरणीसाठी १५० रुपये, शेणखत ५०० रुपये, बियाणे १०० रुपये, कीटकनाशके १०० रुपये, खुरपणी १५० रुपये, मळणी १५० रुपये, बारदान १०० रुपये यासह अन्य खर्च मिळून एका गुंठ्याला १५०० रुपये खर्च येतो.

यातून एक क्विंटल सोयाबीन उत्पादन मिळते. त्याची सध्या हमीभाव किंमत चार हजार ९०० रुपये आहे; परंतु बाजारात सोयाबीनला चार हजार रुपये दर मिळत आहे. मग पीएम किसान योजनेच्या मदतीचा शेतकऱ्यांना किती फायदा मिळाला? मिळालेली मदत शेतात खर्च केली आणि झालेल्या उत्पादनाला केलेल्या खर्चापेक्षा कमी भाव मिळाला, याचा शेतकऱ्याला एक रुपयाही फायदा झाला नाही, हे सत्य आहे.

या योजनेमुळे चार गुंठे शेती करता आली, मिळालेले पैसे शेतातच खर्च झाले. शेतकऱ्याच्या पदरी फक्त कष्ट करणे हेच पडले. त्यामुळे या योजनेने शेतकऱ्यांचा सन्मान नव्हे, तर अपमानच जास्त होत आहे. शेतकऱ्यांनी या योजनेची कधीच मागणी केली नव्हती. सरकारला द्यायचेच असेल तर शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकविलेल्या शेतीमालाला उत्पादनाच्या खर्चाच्या दीड पट हमीभाव द्यावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

AI Chatbot Kisan e Mitr : शेतकऱ्यांना त्यांच्याच भाषेत मदत, रोज हजारो प्रश्नांची उत्तरे, काय आहे ‘किसान ई-मित्र’?

Lakshmi Mukti Scheme: मोफत करा महिलांच्या नावावर सातबारा; सरकारची महिला सक्षमीकरणासाठी लक्ष्मी मुक्ती योजना

Tractor Sales : जीएसटी कपातीमुळे ट्रॅक्टर खरेदी नवरात्रीनंतर गती घेणार?

Pulses Import Policy : आयातीवर ५० टक्के शुल्क लावण्याची उद्योगांची मागणी; पिवळा वाटाण्याने पाडले तूर, मसूर, हरभऱ्याचे भाव

Urea Shortage : आंध्र प्रदेशमध्ये युरिया टंचाई नाही; मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांचा दावा, वायएसआरवर केली टीका

SCROLL FOR NEXT