Orchard Cultivation  Agrowon
ॲग्रो विशेष

Orchard Cultivation : सीआरए तंत्रज्ञानाद्वारे काऱ्हाटीत फळबाग लागवड

Orchard CRA Technology : बारामती तालुक्यात सीआरए तंत्रज्ञानाचा (क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर) वापर करून फळबाग लागवड कृषी विभागामार्फत बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथे सुरू करण्यात आली आहे.

Team Agrowon

Pune News : बारामती तालुक्यात सीआरए तंत्रज्ञानाचा (क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर) वापर करून फळबाग लागवड कृषी विभागामार्फत बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथे सुरू करण्यात आली आहे.

खरीप हंगाम पूर्व तयारी म्हणून काऱ्हाटी येथे बारामतीच्या तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली येथील शेतकरी पार्वती सदाशिव गायकवाड यांच्या शेतावर या तंत्रज्ञानाचा वापर करून फळबाग लागवड प्रात्यक्षिक आयोजित केले होते.

तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल म्हणाल्या, की बारामती तालुक्यात जवळपास ४० कृषी सहायक आहेत. प्रत्येक कृषी सहायकांना हे आधुनिक तंत्रज्ञान किमान त्यांच्या कार्यक्षेत्रातील वीस झाडांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. या नवीन तंत्रज्ञानाचा फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना निश्चित फायदा होईल.

मंडल कृषी अधिकारी चंद्रकांत मासाळ म्हणाले, की सातत्याने कमी-अधिक प्रमाणात होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना फळबागा जगविणे अवघड होत आहे. यासाठी पीक उत्पादनासाठी नैसर्गिक साधन सामग्रीचा वापर सीआरए तंत्रज्ञानाचा अवलंब करून रोपांची लागवड केल्यास दुष्काळी परिस्थितीत फळबाग जगविण्यासाठी हे तंत्रज्ञान वरदान ठरणार.

क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर म्हणजेच हवामान अनुकूल शेती पद्धतीचा अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. या वेळी कृषी पर्यवेक्षक प्रशांत मोरे, बापूराव लोदाडे व मंडल कृषी अधिकारी, सुपे क्षेत्रातील सर्व कृषी सहायक उपस्थित होते.

असे आहे फळबाग लागवडीतील सीआरए तंत्रज्ञान :
शेतात तीन फूट लांब, तीन फूट रुंद, तीन फूट खोल खड्डा करून त्या खड्ड्याच्या चारही कोपऱ्यांवर चार इंच व्यासाचे तीन फूट लांब पाइप उभे केले जातात. माती चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून खड्डा शेणखत, पाचशे ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व मातीच्या मिश्रणाने दीड फूट भरला जातो.

तेथे आंब्याचे झाड लावून उर्वरित खड्डा मातीने भरून घेतला जातो. त्यानंतर खड्ड्यात उभ्या केलेल्या सर्व पाइपमध्ये दीड फूट खडी व दीड फूट जागेमध्ये जमीन पातळीपर्यंत वाळू भरली जाते. त्यानंतर पाइप हळूवारपणे वर ओढून बाहेर काढले जातात.

पाइप काढल्याने चारही कोपऱ्यांत वाळूचा दीड फूट खोलीचा ‘कॉलम’ तयार होऊन रोपांना दिलेले पाणी प्रथम चार कॉलम्समध्ये शोषले जाते. कॉलम पाण्याने पूर्ण भरला की आजूबाजूला पाणी झिरपण्यास सुरुवात होते. अशा प्रकारे मुळांच्या परिसरास तत्काळ ओलावा मिळतो.

सिंचनाची कार्यक्षमता वाढते, पाण्याचे बाष्पीभवन कमी होते, मोकाट सिंचनापेक्षा कमी पाणी लागून जलसंवर्धन होते. तसेच शेणखतामुळे पाणी धरून ठेवले जाते, मुळांना अन्नद्रव्ये मिळतात, रोपांची वाढ झपाट्याने होऊन सशक्त झाड निर्माण होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT