Maha Vikas Aaghadi Agrowon
ॲग्रो विशेष

Maha Vikas Aaghadi : महाविकास आघाडीकडून 'गद्दारांचा पंचनामा'!, विधानसभेत लोकसभेप्रमाणेच पुनरावृत्ती होईल - शरद पवार

Maha Vikas Aaghadi Joint Press Conference : राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. यादरम्यान महाविकास आघाडीकडून महायुती सरकारविरोधात गद्दारांचा पंचनामा प्रकाशित करण्यात आला.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : महायुती सरकारविरोधात गद्दारांचा पंचनामा प्रकाशनाचा कार्यक्रम महाविकास आघाडीकडून रविवारी (ता. १३) घेण्यात आला. यावेळी आघाडीने संयुक्त पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर निशना साधला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार सुप्रिया धुळे, संजय राऊत उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत पुनरावृत्ती होईल, असा दावा केला आहे. तसेच मुख्यमंत्री पदावरून नाना पटोले यांनी पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्याशी सहमती दर्शवली.

महाविकास आघाडीकडून रविवारी संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेतून शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांनी महायुती सरकारवर घणाघाती प्रहार केला. यावेळी शरद पवार यांनी, राज्य सरकारच्या निर्णयांवर सवाल करताना, जे निर्णय सरकारने घेतले ते लागू होणार आहे का? असं सवाल उपस्थित केला. सध्या हे सरकार जसे काम करत आहे, त्यावर राज्यातील जनता नाराज असून आता यांच्या हातून सत्ता काढून घेतली पाहीजे असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.

तसेच बाबा सिद्दिकी यांच्या हत्येबाबत प्रतिक्रिया देताना कोणत्याही प्रकारे तपासावर परिणाम होईल, असं काही बोलणार नसल्याचे शरद पवार स्पष्ट केलं. तर राज्यातील जनता परिवर्तनासाठी उत्सुक असून लोकसभेच्या निकालाप्रमाणेच लोकांना बदल हवा असल्याचे शरद पवार यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधताना, आम्ही आरोपपत्र जनतेच्या न्यायालयात मांडत आहोत. जनताच आमचा न्याय निवाडा करेल, अशी याची खात्री असल्याचे म्हटले आहे. तर महाराष्ट्राला कुणाचाही गुलाम होऊ देणार नाही, अशा शपथ घेतल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, गद्दारांचा पंचनाम आम्ही केला असून येणाऱ्या दीड महिन्यात हे सरकार घालवायला हवं. गद्दाराना सुरक्षा देण्याऐवजी लोकांसाठी वापरा, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

यावेळी नाना पटोले यांनी देखील महायुतीवर सडकून टीका केली असून यावेळी अडीच वर्षात या सरकारने काय केलं याचा पंचनामा केल्याचे म्हटले आहे. तर ज्या लोकांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला तिचं लोकं आज सत्तेत आहेत. यांच्या भ्रष्टाचारामुळे शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. पण फडणवीसांनी अद्यापही माफी मागितलेली नाही. आम्हाला राज्य वाचवायचा आहे. याासठी आमची लढाई आहे. मुख्यमंत्रिपदाची खुर्ची आमच्यासाठी महत्वाची नसल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कांदा दरात काहिशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत मका दर?

Rabi Season 2024 : अति पावसामुळे रब्बीची पेरणी लांबणीवर

Assembly Elections 2024 : गुरुपुष्यामृत योगाच्या मुहुर्तावर अनेक उमेदवारांनी दाखल केले उमेदवारी अर्ज; चंद्रकांत पाटील, भुजबळ, आदित्य ठाकरे, मुंडे यांच्यासह अनेकांचे शक्तिप्रदर्शन

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेविरोधात याचिका करणाऱ्याला सुरक्षा पुरवा

APMC Employee Salary : राज्यातील बाजार समिती सचिव, कर्मचाऱ्यांचे शासनाने वेतन करावे

SCROLL FOR NEXT