CM Eknath Shinde Agrowon
ॲग्रो विशेष

Namo Employment Fair : तरूणांनी आपले भवितव्य साकारावे : मुख्यमंत्री शिंदे

Aslam Abdul Shanedivan

Pune News : 'नमो रोजगार मेळाव्यामुळे तरूणांच्या हाताला काम मिळणार असून त्यांनी आपले भवितव्य साकारावे', असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. ते बारामती येथे आयोजित विद्या प्रतिष्ठाण संस्थच्या आयोजित रोजगार मेळाव्यात बोलत होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विद्या प्रतिष्ठाण संस्थचे अध्यक्ष खासदार शरद पवार, सुप्रिया सुळे, निलम गोऱ्हे, उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री मंगल प्रभात लोढा आदी नेते उपस्थित होते. यावेळी बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालय, बारामती बस स्थानक आणि पोलीस वसाहतीचे उद्घाटन करण्यात आले. 

पुढे शिंदे म्हणाले की, बारामती शहर राज्यासाठी विकासाचं मॉडेल ठरले असून आपल्या प्रमाणेच कायदा आणि सुव्यवस्था ठेवणाऱ्या पोलीसांसाठीही चांगल्या सोयीसुविधा द्यायला हव्यात. तेच आता बारामतीमध्ये देण्यात आल्या आहेत. आमचं सरकार हे लोकांचे आहे, सर्वसामान्यांचे आहे, ते लोकाभिमूख आहे. यामुळे आम्ही विकासाच्या कामात राजकारण आणत नाही आणि हेच आज या मेळावाच्या निमित्ताने स्पष्ट होत असल्याचे शिंदे म्हणाले. 

राज्यात अशाच प्रकारचे मेळाव्यातून ७५ हजारांपेक्षा जास्त रोजगारनिर्मिती झाल्याचे सांगितले. तर आता यात बारामतीमुळे हजार जणांची भर पडेल. तर मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्यात आल्याने नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला आरक्षण असेल असेही शिंदे यांनी म्हटले आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी केले कौतुक 

नमो रोजगार मेळाव्यातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे तोंड भरून कौतुक केले. ते म्हणाले, अजित पवार यांनी या मेळाव्यासाठी भरपूर मेहनत घेतली आहे. इतका मोठा मोळावा पश्चिम महाराष्ट्रात होत आहे. याचा लाभ पश्चिम महाराष्ट्रातील तरूणांनी घ्यावा. या मेळाव्यातून तरूणांच्या कौशल्याप्रमाणे रोजगार मिळेल. 

'बारामती एस टी स्टँड हे आता एखाद्या विमानतळ सारखे झाले असून पोलीस उपमुख्यालय हे सरकारी इमारतीसुद्धा आता कॉर्पोरेट बिल्डिंग सारखी झाली आहे. यामुळे आता पोलिस कर्मचारी हे बारामतीला बदली मागतील. अजित दादा यांनी इतक्या चांगल्या इमारती बारामतीमध्ये बनवल्या आहेत. तसेच त्यांनी राज्यात इतर जिल्ह्यात देखील उभाराव्यात', असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. फडणवीस पुढे म्हणाले, 'आजच्या रोजगार मेळाव्यात ५५ हजार पदं अधिसूचित करण्यात आलेली असून सध्या ३५ हजार अर्ज आले आहेत. त्यामुळे अजूनही अर्ज घेतले जात आहेत. सर्वांना रोजगार मिळेल'. 

हाताला काम मिळावे यासाठी प्रयत्न

या कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले, राज्यातील तरूणांच्या हाताला काम मिळावे यासाठी आमचे सरकार प्रयत्न करत आहे. तरूणांनी सधीचे सोनं करावे. तर बारामतीबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, येथे करोडोंची कामे झाली आहेत. बारामतीचा कायापालट झाला आहे आणि पुढे ही येथे बदल करू फक्त आपले सहकार्य हवे अशी बारामतीकरांना त्यांनी साद घातली आहे. 

आमची साथ असेल 

यादरम्यान राजकारण हे सुरूच असते. पण नव्या पिढीला संधी उपलब्ध करून देऊन त्यांना आधार देण्याचे काम आम्ही करत आहोत. आमची भूमिका ही सहकार्याची आहे असे शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना खात्री देतो की, मुलांच्या हाताला काम देण्यासाठी जे जे सरकार म्हणून तुम्ही कराल, त्यांना आमची साथ असेल असेही शरद पवार म्हणाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT