Nashik News : ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’मार्फत होणाऱ्या कांदा खरेदीत गैरप्रकार झाल्याचे नाशिक जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांनी केलेल्या पाहणीतही सिद्ध झाले आहे. सर्व खरेदी केंद्रांची तातडीने तपासणी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’मार्फत होणाऱ्या कांदा खरेदीत गैरप्रकार होत असल्यामुळे राज्य सरकारने १८ जुलै रोजी शासन निर्णय काढून दक्षता समित्या नेमल्या होत्या. या दक्षता समित्यांनी प्रत्येक सोमवारी अहवाल सादर करावयाचा होता.
मात्र दक्षता समित्यांनी वेळेत अहवाल सादर न केल्यामुळे जिल्हा उपनिबंधक फैयाज मुलानी यांनी २३ जुलै रोजी पथकासह सिन्नर तालुक्यात पाहणी केली असता गंभीर बाबी समोर आल्या आहेत. खरेदी केलेला कांदा एफएक्यू दर्जाचा नसून खरेदी प्रक्रियेत प्रचंड अनियमितता आहेत.
शेतकऱ्यांना ऑनलाइन डीबीटी पेमेंट झाले किंवा नाही या बाबत माहिती उपलब्ध झालेली नाही. अशा अनेक त्रुटी असल्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी नाशिक यांना २४ जुलै रोजी देण्यात आला आहे. त्यामुळे सरकारने ही बाब गांभीर्याने घेत कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
दक्षता समितीत किमान दोन शेतकरी सदस्य घ्या
कांदा खरेदीत मोठा घोटाळा होतो याबाबत शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाने सतत तक्रारी केल्यामुळे दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या. मात्र त्यात एकही शेतकरी प्रतिनिधी नाही.
शासकीय अधिकारी इतर कामात व्यग्र असल्यामुळे वेळेत तपासणी होणार नाही तसेच सरकारी कर्मचाऱ्यांवर जनतेचा विश्वास नाही, म्हणून सर्व समित्यांमध्ये किमान दोन शेतकरी सदस्य असावेत, अशी मागणी घनवट यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.