Supriya Sule Agrowon
ॲग्रो विशेष

Supriya Sule : सुप्रिया सुळे यांची शेतकरी आणि हिंजवडी आयटी पार्कवरून सरकारवर सडकून टीका

Aslam Abdul Shanedivan

Pune News : एकीकडे राज्यातील शेतकरी नैसर्गिक आपत्ती आणि इतर कारणांमुळे अडचणीत आला आहे. तर दुसरीकडे हिंजवडी आयटी पार्कमधील आयटी कंपन्या राज्याबाहेर जाण्याच्या मार्गावर आहेत. यावरून "सरकारला याबाबतीत लक्ष घालायला वेळ नाही", अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरूवारी (ता.३०) समाजमाध्यतून केली. तसेच "राज्यातील महायुती सरकार शेती आणि शेतकरी विरोधी असून रोजगाराच्या मुद्द्यावर सरकार कोणतं पाऊल उचलतंय?" असा सवाल करत सरकारवर निशाणा साधला आहे.

महायुती सरकारला किंचितही घेणं देणं नाही 

"गेल्या काही दिवसापासून राज्याच्या विविध भागात कडकडीत ऊन आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस होत आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. शेतीसह आर्थिक नुकसान झाल्याने हतबल झाला आहे. मात्र महायुती सरकारला किंचितही घेणं देणं नाही", असे सुळे यांनी म्हटले आहे. 

सुळे म्हणाल्या,"हे सरकार शेती आणि शेतकरी विरोधी सरकार आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही. खते, बियाण्यांच्या किंमती आस्मानाला भिडल्या आहेत. मात्र शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी किंचितही उपाययोजना करण्यास सरकार तयार नाही". "उलट सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्यावरील पाणीपट्टी तब्बल दहा पटीने वाढवली जात आहे. शिवाय कृषीपंपांना देखील मीटर बसवले जाणार आहेत. ही शेतकऱ्यांची लूट असून आम्ही सर्वजण याचा तीव्र शब्दांत निषेध करतो", असेही सुळे म्हणाल्या.

शेतकऱ्यांना दिलासा नाही 

नैसर्गिक आपत्ती आणि इतर कारणांमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या मोडून पडला आहे. त्यामुळे संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी वारंवार संसदेसह विविध माध्यमातून केली. मात्र शेतकऱ्यांना दिलासा देण्यास सरकार तयार नाही. उलट त्यांचे अधिकाधिक शोषण कसे करता येईल अशी यंत्रणा प्राधाण्याने तयार करण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप सुळे यांनी केला आहे. 

राज्यातील महत्वाचे उद्योग बाहेर गेले 

यादरम्यान राज्यातील रोजगार देणारे उद्योग एकामागून एक बाहेर जात आहेत. मात्र राज्य सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याची टीका देखील सुळे यांनी केली आहे. तसेच सुळे म्हणाल्या, याआधी देखील राज्यातील महत्वाचे उद्योग बाहेर गेले. तरुणांच्या हक्काचा रोजगार गेला. मात्र सरकारचे यावर नियंत्रण नाही. लक्ष नाही. राज्यातील तरूणाई रोजगाराच्या शोधात असताना उद्योग बाहेर जात आहेत. याला सरकराचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे असेही सुळे म्हणाल्या. 

गेल्या काही दिवसापासून राज्याच्या विविध भागात कडकडीत ऊन आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस होत आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. शेतीसह आर्थिक नुकसान झाल्याने हतबल झाला आहे. यावर मात्र राज्य सरकारने हात वर केले असून आचार संहिता असल्याने उपाय योजना करता येत नसल्याचे कारण पुढे केले आहे. यावरून राज्यातील शेतकरी नाराज झाला असून विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका होत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राजकारण तापले असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या गावी सुट्टीवर गेले आहेत. यावरून देखील आता टीका सुरू झाली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT