Mango Pruning  Agrowon
ॲग्रो विशेष

Matlai Ware : मतलई वारे आंबा बागायतदारांच्या पथ्यावर

Team Agrowon

Ratnagiri News : किमान तापमानात घट झाल्याने आणि अरबी सागरात चक्रीय वाऱ्याची स्थिती प्रभावी ठरल्याने बुधवारी (ता.१३) रात्रीपासूनच कोकण किनारपट्टी भागात शीतलहरी सक्रिय झाल्या आहेत. त्यामुळे कोकणात थंडीची हलकी चाहूल सुरू झाली आहे.

पुढील काही दिवसांत तापमानात दोन ते तीन अंशांची घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मतलई वारे आंबा बागायतदारांच्या पथ्यावर पडणार आहेत. मोहोर येण्याची प्रक्रिया वेगाने होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सध्या कोकण किनारपट्टी भागात काही दिवसांपासून ढगाळ हवामान असून वातावरणात सतत चढ-उतार सुरू आहे. जिल्ह्यातील वातावरणात घट झाल्याने धुक्यासह दव पडत आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याने पहाटे गारठा, तर दुपारी उकाडा अनुभवायला मिळत आहे. येत्या काही दिवसांत थंडी हळूहळू वाढत जात आहे. रत्नागिरीसह किनारी भागात हलका गारठा जाणवू लागला.

मागील आठवड्यात तापमापकावरील पारा खाली घसरला होता. कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस एवढे नोंदविले गेले असून दिवसा मात्र उकाडा कायम आहे. नागरिकांना पहाटे गारवा आणि दुपारी उकाडा अशा संमिश्र हवामानाला तोंड द्यावे लागत आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात रत्नागिरी शहर आणि ग्रामीण भागातील किमान तापमान २१.५ अंश सेल्सिअस तर कमाल ३०.८ अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे.

गेल्या दोन दिवसांत १ अंशाने किमान तापमान घटले आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये जोरदार थंडी जाणवण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. आंबा मोहोराची प्रक्रिया सध्या सुरू आहे. फवारणीचे काम आंबा बागायतदारांकडून सुरू आहेत. या फवारणीला थंडीची जोड मिळावी, अशी अपेक्षा आंबा बागायतदारांची आहे.

मागील दोन दिवसांपासून थंडीचा जोर वाढू लागल्याने आंबा बागायतदार सुखावले आहेत. तसेच मतलई वारे वाहू लागल्यामुळे आंबा बागांमधील मोहोर वेगाने येण्याच्या प्रक्रियेला जोर धरेल. यंदा मोहोर चांगला आला आहे. त्यामुळे उत्पादन चांगले मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

वातावरणातील बदल अचानक झाले आहेत. सोमवारी (ता. १८) सकाळ आर्द्रता कमी होती. त्यामुळे उष्मा वाढला. सध्याचे वातावरण आंब्याला पोषक आहे. मात्र थंडीचा जोर कायम राहिला पाहिजे. अन्यथा कीड-रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
- के. व्ही. मालशे, संशोधक
मतलई वारे पोषक वातावरण निर्माण करतात. या वर्षी सुरुवातीला आंबा हंगामाला पोषक स्थिती आहे. सध्या येणाऱ्या मोहोरामधून प्रत्यक्ष उत्पादन येण्यासाठी मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.
- तुकाराम घवाळी, आंबा बागायतदार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT