Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Refund : नुकसानग्रस्तांना पीकविमा परताव्याची प्रतीक्षा

Crop Insurance Scheme : नांदेड जिल्ह्यात जिल्ह्यात ऑगस्ट तसेच सप्टेंबरमध्ये जोरदार झाला. पाऊस जिल्ह्याच्या सर्वच भागात झाल्यामुळे खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Team Agrowon

Nanded News : जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेतर्गत खरीप हंगाम २०२४ मध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे विमाधारक शेतकऱ्यांनी भरपाई मिळावी, यासाठी स्थानिक नैसर्गिक आपत्ती, विस्तृत स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्‍चात नुकसान या घटकांतर्गत दावे दाखल केले होते. परंतु विमा कंपनीकडून मात्र या नुकसानग्रस्तांना किती परतावा मिळणार याबाबत माहिती मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण झाला आहे.

नांदेड जिल्ह्यात जिल्ह्यात ऑगस्ट तसेच सप्टेंबरमध्ये जोरदार झाला. पाऊस जिल्ह्याच्या सर्वच भागात झाल्यामुळे खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसाचे प्रमाण अधिक असल्याने जिल्ह्यातील अनेक मंडळात एकापेक्षा अधीकवेळा अतिवृष्टी नोंदली गेली. जोरदार झालेल्या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला. यात नदीकाठची पिके खरडून गेली. तर काही ठिकाणी पाणी साचून पिकाचे नुकसान झाले होते.

अतिवृष्टीत जिल्ह्यातील सात लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाने शासनाकडे पाठविली होती. याबाबत शेतकऱ्यांना हंगामातील प्रतिकूल परिस्थिती घटकातर्गत २५८ कोटींची भरपाई मंजूर झाल्याने ती वाटपाचे काम सुरू आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी यानंतरही झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने विमा कंपनीकडे भरपाई मिळावी या संदर्भात दावे दाखल केले होते.

यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती, विस्तृत स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्‍चात नुकसान तसेच पिककापणी प्रयोगाच्या आधारावर नुकसान या घटकातर्गत परताव्यासाठी शेतकऱ्यांनी दावे दाखल केले आहेत.

या घटकातर्गत शेतकऱ्यांना विमा परतावा मंजूर असल्याचे सांगीतले जात असलेतरी विमा कंपनीकडून मात्र याबाबत अधिकची माहिती देण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांना याबाबत माहिती देण्यासाठी सूचित केल्याचे म्हणाले.

नांदेडमधील नुकसानग्रस्त शेतकरी आर्थिक संकटात आहेत. परंतु त्यांना विविध घटकांतर्गतचा विमा परतावा वेळेवर मिळत नाही. विमा परतावा मिळण्यासाठी विलंब कशामुळे होत आहे, याबाबत विमा कंपनीने माहिती देवून शिल्लक घटकातर्गत विमा परतावा लगेच द्यावा.
- हनुमंत राजेगोरे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, नांदेड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bank Crop Loan: बॅंकांनी पीककर्ज प्रकरणांत सकारात्मकता ठेवावी : जिल्हाधिकारी संतोष पाटील

Maharashtra Sugar Industry: हंगामाच्या ५० दिवसांनंतरही सात कारखान्यांचे दरावर मौन

MPKV MoU Signed: कृषी विद्यापीठाचा ‘कार्डियन करेक्ट’शी करार

Honey Village Scheme: ‘मधाचे गाव’ योजना देणार रोजगाराचा गोडवा

Devendra Fadnavis BJP Victory: भाकीत खरं ठरलं! भाजपचा नवा रेकॉर्ड, किती जागा जिंकल्या?; फडणवीसांनी सांगितली आकडेवारी

SCROLL FOR NEXT