Fruit Crop Insurance Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Crop Insurance : आंबा, काजूचा ७८ कोटी विमा मंजूर

Team Agrowon

Ratnagiri News : हवामानावर आधारित असलेल्या फळपीक विमा योजनेअंतर्गत ७८ कोटी ८५ लाख १९ हजार ५९० रुपयांचा परतावा जिल्ह्यासाठी जाहीर झाला आहे. ३२ हजार ४४९ शेतकरी फळपीक विम्याच्या परताव्यासाठी पात्र ठरले आहेत. परतावा जाहीर झाला असला, तरी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर परताव्याची रक्कम कधी जमा होणार, या बाबत प्रतीक्षा आहे.

आंबा, काजू पिकाचा परतावा जाहीर करण्यास उशीर झाला आहे. सहभागी ३० हजार ४ आंबा बागायतदारांपैकी २६ हजार ९६९ शेतकरी पात्र ठरले असून, ७० कोटी चार लाख २३ हजार ७०८ रुपये परतावा रक्कम जाहीर झाली आहे.

टक्केवारी ६९.०६ टक्के आहे. काजूसाठी प्रथमच चांगला परतावा जाहीर झाला आहे. सहभागी ६,८१४ शेतकऱ्यांपैकी ५,४८० शेतकरी पात्र ठरले. आठ कोटी ८० लाख ९५ हजार ८८२ रुपये परतावा रक्कम असून टक्केवारी १२६ टक्के आहे.

गतवर्षीच्या तुलनेत पात्र शेतकऱ्यांची संख्या वाढली असली तरी परताव्याची रक्कम घटली आहे. ७,८३६ लाभार्थी वाढले; परंतु तुलनेने दोन कोटी ३९ लाख ८४४४ रुपये परतावा रक्कम कमी झाली आहे. तर काही मंडलांतील ट्रिगर अॅक्टिव्हेट होत नसल्यामुळे नुकसान होते. यावर उपाययोजना व्हावी, अशी मागणी राजन कदम यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dr Hemant Wasekar : शेतकरी उत्पादक कंपन्यांनी विश्‍वासार्हता जपावी

Crop Damage : मराठवाड्यासह विदर्भातील जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधारा; काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचे नुकसान

Village Story : रस्त्याचे ऋण...

Healthy Pulses : मोड आलेली आरोग्यदायी कडधान्ये

Paddy Crop Management : भातावरील कडाकरपा रोगाचे व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT