Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : विमा हप्ता ३८२ कोटी रुपये, मात्र परतावा मिळाला ४८ कोटी

Team Agrowon

Amaravati News : गेल्या वर्षीच्या खरिपात एक रुपयात पीकविमा योजना राबविण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रतिसादही मोठा होता. तब्बल ३८२.३४ कोटी रुपयांचा विमा हप्ता जमा करण्यात आला. हंगामात सर्वच पिकांचे नुकसान झाले असताना बाधित शेतकऱ्यांना केवळ ४८.७७ कोटी रुपयांचाच परतावा करण्यात आला. त्यामुळे विमा योजनेत केवळ कंपनीचे हित साधले गेल्याचा आरोप आहे.

गेल्या हंगामात याची अंमलबजावणी करण्यात आली. तब्बल ५.१० लाख शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला. त्यातच जुलै ते ऑगस्ट दरम्यान ११ महसूल मंडळात पावसाचा २० ते २५ दिवस खंडदेखील राहिला होता व त्यापूर्वी जुलैमधील अतिवृष्टीनेही पिकांचे मोठे नुकसान झाले. शिवाय सोयाबीन काढणीचवेळी अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

या सर्व आपत्तीनंतर बाधित १.१२ लाखावर शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे तक्रारी नोंदविल्या. यातील बहुतांश तक्रारी तांत्रिक कारणांचा आधार देत फेटाळून लावण्यात आल्या. त्यामुळे फारच थोड्या शेतकऱ्यांना वीमा योजनेचा लाभ मिळू शकला. याविरोधातील शेतकऱ्यांचा आक्रमकपण पाहता पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकाऱ्यांनी फटकारले.

त्यांना भरपाईबाबत वारंवार तंबी देण्यात आली. एफआयआर करणार असल्याचेही सांगण्यात आले. त्याचाही कोणताच परिणाम वीमा कंपनीवर झाला नाही. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी पावसाअभावी बाधित ४१ महसूल मंडळासाठी काढलेली अधिसूचना पीक विमा कंपनीव्दारा ग्राह्य न धरता त्यावर अपील केले होते.

विभागीय आयुक्‍तांसह कृषी सचिवांनी कंपनीचे आक्षेप फेटाळले. त्यानंतर कंपनीने केंद्र सरकारकडे अपील केले. त्यावेळी कंपनीचे आक्षेप ग्राह्य धरण्यात आले व कंपनीला दिलासा मिळाला होता. मात्र त्यानंतरही अनेक शेतकऱ्यांचे दावे प्रलंबित असून अनेकांनी तक्रारी देखील केल्या आहेत. त्याचा कृषी विभागस्तरावर पाठपुरावा सुरू आहे.

कंपनीद्वारा भरपाई (कोटी रुपयांत)

नैसर्गिक आपत्ती ३७.५०

प्रतिकूल हवामान १.३८

काढणीपश्‍चात नुकसान २.८३

एकूण ४८.७७

प्रीमियम

शेतकरी हिस्सा ५.१० लाख

राज्य हिस्सा २२४.६० कोटी

केंद्र हिस्सा १५७.६९ कोटी

एकूण ३८२.३४ कोटी

चुकीच्या पंचनामा रिपोर्टमुळे शेतकऱ्यांना पीकविमा नावाच्या योजनेवर विश्वास राहिला नाही. काही ठिकाणी कमी नुकसान दाखवण्यासाठी खुद्द विमा सर्वेक्षण करणाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या मारल्या. परिणामी शेतकरी भरपाईसाठी विमा कंपनीचे कार्यालय व कृषी विभागात चकरा मारून मेटाकुटीस आला आहे. यामुळे अमरावती जिल्ह्यात एक रुपयांमध्ये जरी पीकविमा योजना असली तरी फक्त ६० ते ७० टक्केच विमा निघत आहे, ही फार मोठी शोकांतिका आहे. त्यातच भरपाईचा रेशोदेखील कमी आहे.
पुष्पक खापरे, जिल्हास्तरीय पीकविमा समिती, शेतकरी प्रतिनिधी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT