Crop Survey Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Survey : हत्तूर, कासेगावात पालकमंत्र्यांकडून द्राक्ष, शेतीपिके नुकसानीची पाहणी

Team Agrowon

Solapur News : सोलापूर जिल्ह्यात २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत अवकाळी पाऊस झाला. यामुळे द्राक्ष, पपई, डाळिंब, कांदा, टोमॅटो, ज्वारी, हरभरा, तूर, गहू आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी (ता. ४) संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथील शेतकरी नागनाथ भोपळे व कासेगाव येथील विक्रम मेटकरी, अजित मेटकरी यांच्या शेतीपिकांच्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेतात जाऊन पालकमंत्री पाटील यांनी पाहणी केली. या वेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, उपसंचालक कृषी राजकुमार मोरे, तहसीलदार राजशेखर लिंबारे उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला असेल, त्या शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीबाबत पीकविमा कंपनीकडे नोंदणी करावी. कोणीही आपत्तीग्रस्त शेतकरी नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहू नये, तसेच नुकसानग्रस्तांना तत्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचेही पालकमंत्री पाटील यांनी शेतकऱ्यांना अश्वासित केले.

कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांची माहिती त्यांनी घेऊन एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सूचित केले.

पाटील म्हणाले, की शेतकऱ्यांना नुकसानीचे पैसे वेळेवर मिळण्यासाठी कृषी विभागाने प्रलंबित ई-केवायसीचे कामही जलदगतीने पूर्ण करून घ्यावे. पीकविमा काढलेल्या सर्व शेतकऱ्यांना नुकसानीचे वेळेवर पैसे मिळणेही अत्यंत गरजेचे असून मागील वर्षी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांच्या पीकविम्याचे प्रलंबित पैसेही तातडीने वितरित करण्याची कार्यवाही करावी.

वस्तुनिष्ठ पंचनामे करा

जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे द्राक्ष, डाळिंब, केळी या फळपिकांसह ऊस, ज्वारी, हरभरा, तूर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या सर्वच पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून अहवाल शासनास तत्काळ सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात नुकसानीबाबत तसेच टंचाईबाबत आढावा बैठक घेण्यात आली.

त्या वेळी पालकमंत्री पाटील यांनी हे निर्देश दिले. आमदार राजेंद्र राऊत, आमदार सचिन कल्याणशेट्टी, प्रभारी जिल्हाधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, प्रांताधिकारी गजानन गुरव, सदाशिव पडदुणे, अमित माळी, कृषी उपसंचालक राजकुमार मोरे उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT