Orange Import Agrowon
ॲग्रो विशेष

Orange Import : ‘टँगो’ पेटंटेड संत्रा वाणाची आयात

Orange Variety : अनोखी चव, आकार, गंध, रंग, उत्पादकता या बाबतीत जगभरातील शेतकरी व ग्राहकांमध्ये मागणी असलेले वैशिष्ट्यपूर्ण संत्र्याचे ‘टँगो’ हे ‘पेटंटेड’ वाण भारतात आयात करण्यात आले आहे.

मुकूंद पिंगळे

Nashik News : अनोखी चव, आकार, गंध, रंग, उत्पादकता या बाबतीत जगभरातील शेतकरी व ग्राहकांमध्ये मागणी असलेले वैशिष्ट्यपूर्ण संत्र्याचे ‘टँगो’ हे ‘पेटंटेड’ वाण भारतात आयात करण्यात आले आहे. राज्यातील लिंबू वर्गीय शेतीचा चेहरामोहराच यामुळे बदलणार आहे. ‘सह्याद्री फार्म्स’ या शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रयत्नांतून या वाणांची आयात करण्यात आली आहे. सध्या त्यावर क्वारंटाईन प्रक्रिया सुरू आहे.

‘सह्याद्री फार्म्स’ने या आधी द्राक्षांचे पेटंटेड वाण यशस्वीरीत्या भारतात आणल आहे. त्यानंतर ‘टँगो‘ हे संत्रा वाण आणले आहे. भारतीय फलोत्पादनातील ही महत्त्वपूर्ण घटना असेल. भारतीय लिंबूवर्गीय फळ उत्पादकांची उत्पादकता व आर्थिक उत्पन्न यात लक्षणीय वाढ होण्यास यामुळे मदत होईल.

‘टँगो‘ हे कॅलिफोर्निया विद्यापीठाकडून विकसित जागतिक स्तरावरील अग्रगण्य संत्रा वाणांपैकी एक आहे. युरोसेमिलास या कृषी कंपनीकडे या वाणाचे जागतिक परवाना अधिकार आहेत. टँगो संत्रा हे मध्यम आकाराचे आणि सोलण्यास सोपे फळ आहे.

त्यास अनोखी चव असून संतुलित आम्ल-साखर गुणोत्तर आणि पुरेपूर रसाळपणा आहे. टँगो हे जवळजवळ बियाविरहित वाण आहे. हेच त्याचे खास वैशिष्ट्य सांगितले जाते. याच्या प्रति २५ फळांमध्ये बियांचे प्रमाण केवळ ०.२ आहे.

जवळच्या इतर कोणत्याही वनस्पतीतील विरोधी परागीकरणाची भीती या वाणात अजिबात नाही. वैशिष्ट्यपूर्ण आकार, रंग, चव, गोडीचे प्रमाण आणि सोलण्याच्या क्षमतेसह तुलनेने सहज साध्य होणारी उत्कृष्ट गुणवत्ता हे या वाणाचे वैशिष्ट्य आहे. हेक्टरी ६० टन इतकी त्याची उच्च उत्पादकता आहे.

‘सह्याद्री फार्म्स‘चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे म्हणाले, ‘‘प्लॅन्ट क्वारंटाईन प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर हे वाण सह्याद्री फार्म्स संलग्न शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत सभासद शेतकऱ्यांना दिले जाईल. त्यामुळे प्रीमियम फळे आणि प्रक्रिया केलेल्या लिंबूवर्गीय उत्पादनांची देशात होणारी आयात कमी होण्यास मदत होईल. राज्यात लिंबूवर्गीय फळपिकाखालील क्षेत्र सुमारे १ लाख ३५ हजारांहून अधिक हेक्टर असून सुमारे १ लाख ७० हजाराहून अधिक शेतकरी या पिकांचे उत्पादन घेत आहेत.

संत्र्यांचे वार्षिक उत्पादन १८ लाख टन इतके आहे. यात नव्या पेटंटेड वाणामुळे मोठा बदल होईल. हा बदल या आधी द्राक्षपिकात यशस्वीरीत्या घडला आहे. याच पार्श्वभूमीवर लिंबूवर्गीय फळपिकांसोबत नवा प्रवास सुरू करीत आहोत. लिंबू वर्गीय फळपिकांतील मूल्यसाखळी मजबूत करणे, शेतकऱ्यांमधील उच्च उत्पादन क्षमता व उच्च उत्पन्न क्षमता वाढविणे, त्यासाठी जागतिक बाजारपेठेत मजबूत स्थान निर्माण करणे, त्याचा भरीव आर्थिक लाभ शेतकऱ्यांना मिळवून देणे हे आता प्रमुख ध्येय आहे.

फलोत्पादनातील महत्त्वाचा टप्पा

महाराष्ट्रातील द्राक्षपिकात मागील ३ दशकांत जे सकारात्मक घडले, तेच आता संत्रा पिकात घडण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्यांच्या समुहशक्तीच्या जोरावर ज्या प्रमाणे जगप्रसिद्ध स्पर्धाक्षम पेटंट वाण भारतात आयात झाले आणि ते आता इथल्या मातीत स्थिरावत आहेत. तसेच संत्र्याचे वाणही परदेशातून भारतात दाखल झाले आहे.

टँगो वाणामुळे संत्रा उत्पादकांवर प्रभाव पडणार आहे. लिंबूवर्गीय उत्पादनात आघाडीवर असलेले महाराष्ट्र राज्य हे याच पिकातील क्रांतीचा साक्षीदार होईल. भारतातील सध्याच्या संत्र्याच्या वाणाला जागतिक बाजारपेठेत मर्यादित वाव होता. या नवीन वाणामुळे संधीची दारे खुली होतील, असा विश्वास आहे.
- विलास शिंदे, अध्यक्ष, सह्याद्री फार्म्स, मोहाडी, जि. नाशिक.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Loss Compensation: पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू ः अजित पवार

Maharashtra Sugar Industry: वारेमाप ‘एफआरपी’ची स्पर्धा,आर्थिक बेशिस्त थांबवा

Mahatma Phule Agricultural University: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या यंत्रांना पेटंट

Farm Relief Delay: कर्जमाफीच्या फाइलवर सही करताना मात्र लकवा मारतो: हर्षवर्धन सपकाळ

Agriculture Minister Dattatray Bharane : शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडविणारे काम करा: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

SCROLL FOR NEXT