Water Scarcity  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : वाढत्या उष्‍म्‍याबरोबरच पाणीटंचाईच्या झळा

Water Crisis : उन्हाचा तडाखा वाढल्याने रायगड जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठला आहे. लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या धरणांमध्ये फक्त ४२ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

Team Agrowon

Raigad News : उन्हाचा तडाखा वाढल्याने रायगड जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठला आहे. लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या धरणांमध्ये फक्त ४२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. पाच धरणांमध्ये २५ टक्के किंवा त्याहून कमी पाणीसाठा आहे. अशातच पाणीपुरवठा योजनांची २२३ कामे अद्याप अपूर्ण आहेत. त्यामुळे उष्‍म्‍याबरोबरच टंचाईमुळे रायगडवासीय बेजार झाले आहेत.

रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये पेण तालुक्यातील सात गावे व ३० वाड्यांना १० खासगी टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली असून, त्याखालोखाल पनवेल तालुक्यातील पाच गावे व १४ वाड्यांना १० टँकरने, तर अलिबाग तालुक्यातील दोन गावांना एका खासगी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

रायगड जिल्ह्याचा पारा मार्चपासून ३६ अंशांवर जात आहे. त्यामुळे धरणांतील पाणीसाठ्याचे वेगाने बाष्पीभवन होत आहे. सध्या ४४२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. महाड, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन, माणगाव, कर्जत, पेण या तालुक्यामध्ये तर मार्चपासूनच टंचाईच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत. अलिबाग, पनवेलसारख्या शहरी भागातही अनेक रहिवासी सोसायट्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

सोसायट्यांमध्ये काही तास पाणी येत असून, अनेकांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. गतवर्षी उत्तम पाऊस झाल्यामुळे रायगडमधील धरणे पूर्ण भरली होती, आजमितीला २८ धरणांमध्ये ४३.९९ टक्के साठा शिल्लक आहे. प्रत्येक तालुक्यासाठी आराखडे तयार झाले असून, किती गावे, पाडे, वाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार, याचा आढावा घेत, प्रशासनाने पाच कोटी ६२ लाख ६८ हजारांचा टंचाई आराखडा तयार केला आहे.

पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन

पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी दरवर्षी कोट्यवधींचा आराखडा तयार केला जातो, मात्र तरीही टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असल्‍याने नागरिकांमधून संताप व्यक्‍त होत आहे. तापमानात झपाट्याने वाढ होत असल्याने पुढील महिन्यात टँकरची मागणी वाढण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनातर्फे गावांना व वाड्यांना टँकर पुरविण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून नागरिकांना करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Fragmentation Act: शहरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची महसूल मंत्री बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा

QR Code For fertilizer: ‘क्यूआर कोड’वरून कळणार उपलब्ध खते

Bridge For Ghanegar: साकवावरून जीवघेणा प्रवास

Dahanu Floods: डहाणूमध्ये सूर्या नदीला पूर; सतर्कतेचा इशारा

Tree Plantation: दहा हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

SCROLL FOR NEXT