Beed News : तीन दिवस ढगाळ वातावरणासह काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर जिल्ह्यात पुन्हा उन्हाचा तडाखा वाढत आहे. तापमानाचा पारा काही दिवस ४० अंशांवर पोचत असल्याने १२ वाजेच्या दरम्यान मुख्य चौक, रस्ते आणि बाजारपेठांतही शुकशुकाट दिसत आहे. आरोग्य विभागाने जिल्हा रुग्णालयात उष्माघाताच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष उभारला आहे.
जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपासूनच प्रचंड उष्णता सुरु होत असून, दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत तापमान ३९ अंशांपर्यंत पोचते. ज्यामुळे रस्त्यावर फिरणं आणि बाहेर काम करणे अधिक कठीण होऊन बसले आहे.
शेतकरी, मजुरी करणारे व रस्त्यावर काम करणाऱ्यांवर याचा अधिक परिणाम जाणवत आहे. शेतकरी शेतीची कामे सकाळ व सायंकाळच्या प्रहरी करत आहेत. सध्या शेतात उन्हाळी कामे सुरु आहेत. दरम्यान, कायम वाहनांच्या गर्दीने गजबलेल्या चौकांत १२ वाजेनंतर शुकशुकाट दिसून येत आहे.
उष्माघातासाठी स्वतंत्र कक्ष
जिल्हा शल्यचिकीत्सक तथा जिल्हा रुग्णालयातील औषधीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय राऊत म्हणाले, अधिक तापमानामुळे डिहायड्रेशन, शरीर तापणे, आणि इतर उष्माघाताचे संकट वाढू शकते. त्यामुळे नागरिकांना अत्यधिक उन्हात बाहेर पडणे टाळावे.
उष्माघाताची लक्षणे दिसल्यानंतर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्याचा सल्लाही डॉ. राऊत यांनी दिला. जिल्हा रुग्णालयात उष्माघाताच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. यासाठीची पुरेशी औषधीही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
उष्णतेचा त्रास कुणाला होतो?
उन्हात बाहेर कष्टाची कामे करणारे लोक, निराश्रित, बेघर नागरिक वृद्ध आणि लहान मुले.
पुरेशी झोप न झाल्यास. गर्भवती महिला. अनियंत्रित मधुमेह. हृदयरोग असणारे.
अपस्मार रुग्ण. दारूचे व्यसन असणारे.विशिष्ट औषधी घेणारे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.