Mango Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Farming : आंबा विक्रीसाठी प्रतवारी ठरते महत्त्वाची

Team Agrowon

शेतकरी नियोजन

Mango Orchard Management :

शेतकरी : राजेंद्र मोतीराम कदम

गाव : मजगाव, ता. जि. रत्नागिरी

आंबा क्षेत्र ; ५० एकर

राजेंद्र कदम यांची सुमारे ५० एकर आंबा बागायत आहे. त्यात सुमारे तीन हजारांहून अधिक हापूसची कलमे आहेत. दर्जेदार आंबा उत्पादनासाठी वर्षभर बागेतील विविध कामांचे योग्य नियोजन करून त्यानुसार कार्यवाही केली जाते. आंबा विक्रीसाठी पाठविण्यापूर्वी प्रतवारीवर विशेष भर दिला जातो. प्रतवारीमध्ये मध्यम आकाराची आंबा फळे पाच आणि सहा डझनांच्या पेटीत भरली जातात. त्यामुळे ग्राहकाला अपेक्षित फळे मिळून दरही चांगला मिळतो. मागील वर्षीचा हंगाम संपल्यानंतर जून महिन्याच्या सुरुवातीस पुढील हंगामाचा हिशेब केला जातो. त्यामुळे काटेकोर नियोजन करणे शक्य होत असल्याचे राजेंद्र सांगतात.

मागील कामकाज

जूनमध्ये पाऊस सुरी झाला, की रासायनिक खतमात्रा देण्यासाठी कलमांच्या बुंध्यात ओलावा असल्याची खात्री केली जाते. साधारण १५ जूनला खतमात्रा देण्यास सुरुवात केली. हे काम ३० जूनपर्यंत सुरू होते. खतांमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्ये, ९ः२४ः२४ हे खत ३ किलो तसेच शेणखत यांची मात्रा दिली. याशिवाय बागेतील पालापाचोळा गोळा करून तो कलमांच्या बुंध्यात टाकून घेतला.

खत देण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर कलमांची आळी व्यवस्थित करून घेतली. ऑगस्ट महिन्यात कलमांना संजीवकांच्या मात्रा दिल्या. कलमांच्या आकारमानानुसार संजीवकांच्या मात्रा ठरविल्या जातात.

सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर बागेत साफसफाईची कामे करण्यास सुरुवात केली. बागेत वाढलेले गवत, पालापाचोळा गोळा करून तो कलमांच्या बुंध्यात टाकून घेतला. त्यावर मातीचा तीन फुटांचा थर दिला. त्यामुळे आपसूक खत तयार होते.

ऑक्टोबर महिन्यात मोहर येण्यास सुरुवात झाली. त्याच वेळी ज्या झाडांना पालवी आली होती, ती वाचविण्यासाठी रासायनिक कीटकनाशकांची फवारणी केली. या नवीन पालवीला जानेवारी महिन्यात मोहर आला.

जानेवारी महिन्यात कलमांची हलवणी करण्यात आली. त्यामुळे सुकलेला मोहर गळून पडण्यास मदत झाली.

कलमांवर अंडाकृती आकाराची फळे लागल्यानंतर त्यावर विविध कीड-रोगांच्या प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. प्रामुख्याने तुडतुडे, फुलकिडींचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे फळांचा दर्जा खालावतो. त्यासाठी शिफारशीनुसार रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करून घेतली.

या वर्षी मोहरासह कैरीवर फुलकिडींचा प्रादुर्भाव दिसून आला. त्यासाठी शिफारशीनुसार फवारणी केली.

पहिल्या टप्प्यातील आंबा फेब्रुवारी महिन्यात हाती आला. तो मुंबई येथील वाशी मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठविला होता. साधारण पाच डझनाच्या पेटीला ६ हजार रुपये इतका दर मिळाला. पुढील काळात फेब्रुवारी आणि

मार्च महिन्यांत मार्केटमध्ये हापूस आंब्याची अधिक आवक झाल्याने पेटीचे दर वेगाने कमी होत गेले.

पुढील नियोजन

सध्या तापमानात चांगली वाढ झाली आहे. कलमांचे वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी सिंचनाचे काटेकोर नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. दापोली कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार प्रति कलम २०० लिटर पाणी देण्याचे नियोजित आहे.

आतापर्यंत साधारण ३० टक्के आंबे काढून बाजारात पाठविला आहे. अजून ७० टक्के आंबा उत्पादन पुढील दीड महिन्यात मिळेल. त्यासाठी नियोजन केले आहे. जसजसा आंबा परिपक्व होत जाईल तसे काढणी करत जाणार असल्याचे कदम यांनी सांगितले.

आंबा काढणी करताना विशेष काळजी घेतली जाते. देठ तुटणार नाही याची काळजी घेतली जाते. देठ तुटला तर त्यामधून येणाऱ्या चिकाचे डाग फळावर पडतात. त्यामुळे फळांचा दर्जा खालावतो. आंबा काढणीसाठी पारंगत मजुरांची उपलब्धता केली जाते. एकावेळी चार फळे राहतील अशा पद्धतीने आंबा काढणी केली जाते.

काढलेला आंबा त्वरित गोडाउनमध्ये आणला जातो. जेणेकरून उन्हाचा फळांवर परिणाम होणार नाही. काढणीनंतर सर्व आंबे गोळा करून त्यांची प्रतवारी केली जाते. फळांचे वजन आणि एका पेटीतील आंबे यांचा विचार करून प्रतवारी केली जाते.

सर्वाधिक आंब्याची वाशी बाजारात विक्रीसाठी पाठविला आहे. याशिवाय पुण्यात काही ग्राहकांना आंबा विक्री केली आहे. गतवर्षी हंगामात पाच हजार पेटी आंबा उत्पादन मिळाले. याशिवाय कॅनिंगसाठीही आंबा विक्री केली जाते.

राजेंद्र कदम, ९४२२४३३१३३, ९२७२५२६८६८

(शब्दांकन ः राजेश कळंबटे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT