Amravati News: सोयाबीनच्या शासकीय खरेदीकरिता निश्चित करण्यात आलेल्या मर्यादित उद्दिष्टामुळे राज्यातील शेतकऱ्यांना सुमारे २२ लाख टन सोयाबीन खुल्या बाजारात विकावे लागणार आहे. पण खुल्या बाजारात पडत्या दरात सोयाबीन खरेदी होत असल्यामुळे या व्यवहारात शेतकऱ्यांचे तब्बल २९२ कोटी १६ लाख रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे..राज्यात ४० लाख टन सोयाबीन उत्पादनाचा अंदाज असून त्यापैकी १८ लाख टन सोयाबीनची खरेदी शासनाकडून होईल. सोयाबीन खरेदीसाठी यंदा महाराष्ट्र राज्य पणन मंडळास अभिकर्ता म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या माध्यमातूनच खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात येत आहे. राज्यात २५० वर केंद्रे निश्चित करण्यात आली असली तरी अनेक ठिकाणी ओलावा अधिक असल्याचे सांगत हमीभाव केंद्रांवर सोयाबीन नाकारले जात आहे..Soybean Farmer Crisis: शेतकऱ्यांचे प्रतिक्विंटलमागे २ हजारांचे नुकसान, सोयाबीनला ६ हजार भाव कधी मिळणार?; काँग्रेसचा सवाल.राज्यभरात एकूण उत्पादनाच्या केवळ पंचवीस टक्के सोयाबीन खरेदी केली जाणार असून त्याची खरेदीमर्यादा १८ लाख ५० हजार ७०० टन इतकीच आहे. राज्यात यंदाच्या खरिपात ४७ लाख हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली आहे. म्हणजेच १ कोटी १७ लाख ५० हजार एकर क्षेत्रात सोयाबीनचे उत्पादन होत आहे. पावसाने सोयाबीनचे नुकसान झाले असून राज्याची उत्पादनाची सरासरी एकरी.चार क्विंटल असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे.शासकीय केंद्रांवर ५ हजार ३२८ रुपये प्रतिक्विंटल हमीदराने खरेदी केली जाणार असून राज्यात यंदा ९८ कोटी ६० लाख रुपयांची सोयाबीन खरेदी होणार आहे. उर्वरित २२ लाख टन सोयाबीन शेतकऱ्यांना खुल्या बाजारात विकावे लागणार आहे. खुल्या बाजारात सध्या सरासरी चार हजार रुपये क्विंटल दर असून या व्यवहारात शेतकऱ्यांचे प्रतिक्विंटल १३२८ रुपयांचे नुकसान होत आहे. त्यातून शेतकऱ्यांचे २९२ कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे..Soybean Crisis: ‘गोल्डनबीन’ची उतरती कळा .बाजार समिती व एफपीसींना अधिकारसोयाबीनच्या शासकीय खरेदीची केंद्रे पणन मंडळाने बाजार समिती व शेतकरी उत्पादक कंपन्यांना दिले आहेत. अमरावती विभागात ५५ बाजार समित्या असून यातील ३० बाजार समित्या व ६४ शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रस्ताव पणन मंडळाच्या अमरावती विभागीय कार्यालयाकडे दाखल होते. १५ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष खरेदीस प्रारंभ झाला. त्यापूर्वी केवळ नोंदणी करण्यात आली. एफपीसींना खरेदीचे अधिकार देताना १० किलोमीटरची अट आहे.....असे होणार नुकसानराज्यातील सोयाबीनखालील एकूण क्षेत्र ः ४७ लाख हेक्टर (१ कोटी १७ लाख ५० हजार एकर)राज्यातील उत्पादनाची सरासरी ः एकरी चार क्विंटलराज्यातील अपेक्षित उत्पादन ः ४० लाख टन (अंदाजित)केंद्राने जाहीर केलेला हमीदर ः ५ ,३२८ रुपये प्रतिक्विंटल.खुल्या बाजारात मिळणारा सरासरी दर ः चार हजार रुपये प्रतिक्विंटलसध्या होत असलेले प्रतिक्विंटल नुकसान ः १३२८ रुपये प्रतिक्विंटलशासकीय खरेदीचे उद्दिष्ट ः १८ लाख ५० हजार ७०० मेट्रिक टनखुल्या बाजारात जाणारा सोयाबीन ः २२ लाख टनशेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान ः २९२ कोटी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.