PESA Recruitment Protest Agrowon
ॲग्रो विशेष

PESA Recruitment Protest : संततधार पावसातही आदिवासींच्या आंदोलनाला 'धार'; बुधवारी सर्वपक्षीय आदिवासी मोर्चा 

J P Gavit Protest For PESA Recruitment : नाशिक जिल्ह्यातील पाऊस अद्यापही थांबलेला नाही. पण पेसा नियुक्त्यांसाठी माजी आमदार जे पी गावित यांचे उपोषण सुरूच आहे. 

Aslam Abdul Shanedivan

Pune News : नाशिक जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर वाढला असून येथे गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. तर अशा पावसातही पेसा नियुक्त्यांसाठी माजी आमदार जे पी गावित यांचे उपोषण सुरूच आहे. तर आपण आदिवाशांच्या मागण्यांवर ठाम असल्याचेही गावित यांनी म्हटले आहे. तसेच आदिवाशांच्या विविध प्रश्नांसह 'पेसा' कायद्यान्वये राज्यातील तेरा जिल्ह्यांमध्ये १९ संवर्गातील आदिवासी उमेदवारांच्या नियुक्त्यांसाठी बुधवारी (ता.२८) सकाळी सर्वपक्षीय आदिवासी मोर्चा काढला जाणार आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. तर ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आदिवासी समाज उभा राहिल्याने सरकारमधील महायुतीची कोंडी झाली आहे.  

'पेसा' कायद्यान्वये राज्यातील तेरा जिल्ह्यांमध्ये १९ संवर्गातील आदिवासी उमेदवारांच्या नियुक्ती कराव्या, या प्रमुख मागणीसाठी नाशिकमध्ये आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन माजी आमदार जे पी गावित यांच्या नेतृत्वात सुरू असून भाजप पुरस्कृत महायुती सरकारने आदिवासींवर अन्याय केला, अशी भूमिका गावित यांच्यासह आदिवासी नेत्यांची आहे. तर पेसा नियुक्त्यांसाठी नाशिक येथील आदिवासी विकास भवन कार्यालयाच्या परिसरात राज्यभरातील आदिवासी एकत्र आले आहेत. त्यांना सर्वपक्षीय नेत्यांचा पाठिंबा देखील मिळू लागला आहे. त्यामुळे सत्ताधारी महायुती सरकारची चांगलीच कोंडी होत आहे. 

गेल्या चार दिवसापासून नाशिक येथील आदिवासी विकास भवन कार्यालयाच्या परिसरात राज्यभरातील आदिवासी उमेदवारांचे आंदोलन सुरू आहे. मात्र या आंदोलनावर अद्यापही तोगडा निघालेला नाही. तर उमेदवारांच्या नियुक्त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे खोळंबल्याचे दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. मात्र यात काहीतरी काटकारस्थान असल्याचे आदिवासी नेत्यांचे मत असून जोपर्यंत 'पेसा' कायद्यान्वये राज्यातील तेरा जिल्ह्यांमध्ये १९ संवर्गातील आदिवासी उमेदवारांच्या नियुक्ती होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा गावितांसह आदिवाशी नेत्यांनी घेतला आहे. 

आदिवाशी नेत्यांनी यावरून, सर्वोच्च न्यायालयाच्या आडून राज्य सरकार आदिवासींच्या नियुक्त्या रोखत आहे. आदिवासी उमेदवारांऐवजी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना नियुक्त देत असल्याचा आरोप गावितांसह आदिवाशी नेत्यांनी केला आहे. तर सध्या भर पावसातही नाशिकच्या आदिवासी विकास भवन कार्यालयाच्या परिसरात आंदोलन सुरू आहे. 

आंदोलकांनी तीन दिवसापासून सुरत-पेठ रस्ता रोखल्याने कित्येक किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यामुळे गुजरातकडे होणारी वाहतूक रोखली गेली आहे. यामुळे अनेकांचा याचा त्रास सहन करावा लागत आहे. यादरम्यान लाडकी बहीण योजनेसाठी मुख्यमंत्र्यांसह विविध मंत्री नाशिकमध्ये होते. यावेळी मंत्रिमंडळातील एखादा मंत्री येथेजाऊन चर्चा करेल असे वाटत होते. मात्र तसे झाले नाही. यावरून देखील आता आंदोलकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी निर्माण झाली आहे. 

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच लाडकी बहीण योजनेच्या निधीवरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तर सरकारने आपल्या विविध योजनांसाठी आदिवाशींच्या बजेटवर डल्लातर मारला का? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसेच सरकारने आदिवासीच्या बजेटचे विवरण द्यावे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT