Urea Fertilzer Agrowon
ॲग्रो विशेष

Urea Shortage: खानदेशात युरियाची टंचाई! शेतकरी हवालदिल

Khandesh Farmer Crisis: खानदेशात रब्बी हंगामात युरियाची तीव्र टंचाई जाणवत असून, काही खत विक्रेते कृत्रिम टंचाई निर्माण करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. डीएपी, १०.२६.२६ खताआड युरियाचा काळाबाजार वाढल्याने शेतकऱ्यांना दुप्पट खर्च करावा लागत आहे.

Team Agrowon

Jalgaon News: खानदेशात रब्बी हंगामात पिकांची पेरणी पूर्ण होत आली आहे. परंतु खतपुरवठा सुरळीत झालेला नाही. डीएपी, १०.२६.२६ नंतर आता युरियाची टंचाई तयार झाली आहे. ही कृत्रीम टंचाई असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे असून, सहा युरियाच्या गोण्यांसमवेत एक मिश्र खताची गोणी घेण्याची सक्ती काही केंद्रचालक करीत आहेत.

खानदेशात रब्बीची पेरणी अपेक्षेपेक्षा अधिक आहे. डीएपी, १०.२६.२६ ही खते दुरापास्त असतानाच युरियाची समस्याही नंदुरबारमधील शहादा, तळोदा, धुळ्यातील शिरपूर, जळगावातील जळगाव, पाचोरा, चोपडा आदी भागांत आहे. ही टंचाई काही खत विक्रेते तयार करीत असल्याच्याही तक्रारी आहेत. केळी, भाजीपाला व अन्य पिकांची लागवड सुरू आहे. तसेच अनेक केळी बागा वाढीच्या स्थितीत आहेत. यामुळे जिल्ह्यात खतांची मागणी कायम आहे. खरिपातही खतटंचाई होती.

आता रब्बीतही तीच समस्या आहे. काही कंपन्या आपल्या युरियासमवेत न खपणारी खते कृषी केंद्र, वितरकांच्या माथी मारत आहेत. यामुळे हे लिंकिंग सुरू झाल्याचे शेतकऱ्यचे म्हणणे आहे. जळगाव जिल्हा रासायनिक खतांच्या वापरात आघाडीवर आहे. केळी, भाजीपाला पिकांसाठी बारमाही खते, विद्राव्य खतांची मागणी असते. केळीसाठी युरिया, पोटॅश व मिश्र खतांची खरेदी शेतकरी करून ठेवतात.

एकाच वेळी सर्व खते खरेदीवर शेतकऱ्यांचा भर असतो. तर शेतकरी ज्वारी, बाजरी, मका पेरणी करतानाच रासायनिक खतांची पहिली मात्रा देतात. परंतु हंगाम जेमतेम सुरू होत असतानाच युरियाची टंचाई तयार झाली आहे. युरियाचा साठा पुरेसा असल्याची बतावणी कृषी विभाग सतत करीत आहे. परंतु युरियाची टंचाई तयार झाली आहे. युरियाचा सुमारे एक लाख ३० हजार टन एवढा पुरवठा खरिपात अखेरपर्यंत अपेक्षित होता. परंतु एवढा पुरवठा झाला नाही. पुरवठा रखडत सुरू होता.

खत कंपन्या रेल्वेच्या माध्यमातून पुरवठा करतात. मुंबई, गुजरातमधून खतांचा पुरवठा होतो. परंतु हा पुरवठा निर्देशित लक्ष्यांकाच्या तुलनेत खरिपात कमी झाला आहे. दर महिन्याला युरिया पुरवठ्याचा वेगळा लक्ष्यांक आहे. मे महिन्यातच एकूण लक्ष्यांकातील २५ टक्के पुरवठा अपेक्षित होता. परंतु अत्यल्प पुरवठा झाला आहे. आता रब्बीतही समस्या आहे. ग्रामीण भागात युरियाची अधिकची टंचाई आहे. लिंकिंगमुळे अधिकचा निधी शेतकऱ्यांना खर्च करावा लागत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Post Monsoon Rain: मॉन्सूनोत्तर पाऊसही सरासरीपेक्षा अधिक

Maharashtra Rain Forecast: राज्यात पावसाला पोषक हवामान

Rain In October 2025 : देशात ऑक्टोबर महिन्यात सरासरीच्या ११५ टक्के पावसाचा अंदाज; राज्यावर पावसाचं सावट

Farmer Union Protest: ओला दुष्काळ, ५० हजार रुपये मदतीच्या मागणीसाठी शेतकरी-शेतमजूर संघटनांचे आयुक्तांना निवेदन

Paddy Harvesting : सिंधुदुर्गात पुन्हा जोरदार पाऊस; भातपीक कापणी रखडली

SCROLL FOR NEXT