Pune News : वडगाव दरेकर (ता.दौंड) येथील लिफ्ट परिसरातील भीमा नदीचे पात्र पाण्याअभावी कोरडे पडले आहे. यामुळे नदीवरील कृषिपंप बंद असल्याने शेतातील उभी पिके करपू लागली आहेत.
भामा आसखेड धरणातून सोडलेले पाणी या परिसरातील भीमा नदीपात्रात पोचण्यासाठी जलसंपदा विभागाने वरील बंधाऱ्याची ढापे काढून उपाययोजना करण्याची मागणी दौंड व श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
देऊळगाव राजे व वडगाव दरेकर शिवेजवळील लिफ्टपरिसरातील नदीपात्र कोरडे पडल्याने शेतीपंप बंद पडले आहेत. तसेच देऊळगाव राजे व खोरवडी येथील नदीवरील बंधाऱ्यामध्ये पाण्याने तळ गाठला आहे. अनेक शेतकऱ्याचे कृषिपंप पाण्याअभावी बंद पडत असल्याने शेतकरी नदीपात्रात खड्डे खोदत आहेत.
सध्या उन्हाळा असल्याने पिकांना आठ दिवसाला पाणी द्यावे लागत आहे. पाण्याअभावी शेतातील ऊस, मका, कांदा, भुईमूग, उडीद यासारखी पिके सुकू लागली आहेत. यामुळे शेतकरी पाण्याची चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत आहे. सध्या भामा आसखेड धरणातून बंधारे भरण्यासाठी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे.
धरणातील पाण्याचा वेग वाढविण्याची मागणी
पाणी नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. धरणातून सोडलेले पाणी दौंड तालुक्याच्या पूर्व भागात पोहचण्याकरिता पाण्याचा वेग वाढविण्यासाठी जलसंपदा विभागाने आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.