Water Crisis : मेळघाटात पाणीटंचाई योजनांचा बट्ट्याबोळ

Water Supply Scheme : २२ गावांत जलजीवन योजनेची कामे गेल्या दोन वर्षांपासून मंदगतीने सुरू असून, तीन गावांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्णत्वास आले असल्यावरही अद्यापपर्यंत वीजजोडणी केली गेली नाही.
Water Scarcity
Water Scarcity Agrowon
Published on
Updated on

Amaravati News : उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने मेळघाटातील पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होत चालला आहे. २२ गावांत जलजीवन योजनेची कामे गेल्या दोन वर्षांपासून मंदगतीने सुरू असून, तीन गावांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्णत्वास आले असल्यावरही अद्यापपर्यंत वीजजोडणी केली गेली नाही. त्यामुळे नागरिकांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.

पाणीटंचाईमुळे स्वच्छ पाण्याची कमतरता असून दूषित पाणी प्यायल्याने नागरिकांमध्ये आजार पसरत आहेत. अनेक गावांमध्ये जलजीवन मिशनची कामे सुरू असतानाही भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. २०१९ मध्ये सुरू करण्यात आलेल्या या योजनेचे उद्दिष्ट २०२४ पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला नळाचे पाणी पुरविणे आहे. मात्र २०२४ उलटून २०२५ आले तरी आजपर्यंत २२ गावांत नळयोजना अस्तित्वात नसल्याने जलजीवन मिशनच्या कामात दिरंगाई होत असल्याचे दिसते.

Water Scarcity
Water Scarcity : उष्‍म्‍याबरोबरच टंचाईच्या झळा

चिखलदरा तालुक्यातील तारुबांधा, वाकी, खडीमल, लवादा, मोथा या गावांत टँकरने पाणीपुरवठा केली जात आहे, तर अजून पाच गावे गौलखेडा बाजार, बहादरपूर, आलाडोह, कोरडा गवळी, ढाणा, मेहरिआम येथील प्रस्ताव पंचायत समितीला प्राप्त झाले आहेत.

चिखलदरा तालुक्यातील जामली आर, अंबापाटी, खोंगडा या गावात जलजीवन मिशन अंतर्गत नवीन विहीर, पाइपलाइन, पाण्याच्या टाकीसाठी प्रतिगाव दीड कोटी रुपये खर्च करून योजना कशीबशी कार्यान्वित केली गेली. पण अद्यापही या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींवर वीजपुरवठा केला गेला नाही. सध्या तारांवरून एक वर्षापासून आकडे टाकून वीजपुरवठा केला जात आहे. तसेच पाइपलाइन निकृष्ट दर्जाची टाकली गेली, त्यामुळे जागोजागी पाइपलाइन फुटत आहे.

Water Scarcity
Maharashtra Water Scarcity: राज्यातील ७८४ गावे, वाड्यांची तहान भागतेय टँकरवर

जलपातळी गेली खोल

संबंधितांकडून संभाव्य पाणीटंचाई उपाययोजनांच्या गावाचा आराखडा तयार करण्यात येतो. पाण्याची पातळी खोल गेली असल्याने नदी, नाले व हातपंपांवर पाण्यासाठी महिलांना कसरत करावी लागत आहे.

कायमस्वरूपी उपाययोजनांना फाटा

मेळघाटातील शेकडो गावांमध्ये दर उन्हाळ्यात पाण्याची भीषण टंचाई असते. आदिवासी बांधवांना पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात भटकंती करावी लागते. अनेक मैल पायपीट करून सुद्धा त्यांची शुद्ध पाण्याची तहान भागत नाही. त्यामुळे येथील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी शासनाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. परंतु दरवर्षी तात्पुरत्या योजना आखल्या जातात व वेळ मारून नेण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com