Seed Conference  Agrowon
ॲग्रो विशेष

Seed Production : शेतकऱ्यांना बियाणे शुद्धच मिळावे

Cotton Seed : कापसाचे उत्पादन होते तिथेच त्याच्या ट्रायलही व्हाव्या, आणि हे बियाणे शुद्धच मिळावे ही कळकळीची विनंती हिंगोली जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी दिगंबर कदम यांनी केली.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : बियाण्याचे उत्पादन वाढवावंच लागेल बियाण्याची जादा दराने विक्री होऊ नये. कापसाचे उत्पादन होते तिथेच त्याच्या ट्रायलही व्हाव्या, आणि हे बियाणे शुद्धच मिळावे ही कळकळीची विनंती हिंगोली जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी दिगंबर कदम यांनी केली.

नुकत्याच पार पडलेल्या सीड परिषदेत समारोप बुधवारी (ता. १३) बियाणे उद्योग आणि शेतकरी सहभाग याविषयीच्या महत्त्वपूर्ण चर्चासत्रात श्री कदम बोलत होते. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. आर. एस. परोडा यांची तसेच केंद्र सरकारच्या क्वालिटी कंट्रोलचे उपयुक्त डॉ. डी. के. श्रीवास्तव, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

या चर्चासत्रात कवल चौहान, डॉ. आम्रपाली आखरे, डॉ. वीरशेट्टी पाटील बिराजदार, विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे, ॲड अमोल रणदिवे, डॉ. एस. बी. घुगे, डॉ. आनंद साळुंखे यांच्यासह प्रताप काळे व सुषमा देव आदींनी सहभाग घेतला.

श्री चौहान म्हणाले, की केंद्र सरकारने १० हजार एफपीओ स्थापन करून शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्याचा प्रयत्न चालविला आहे. परंतु त्यामध्ये अनेक अडचणी आहेत. एफपीओसाठी पॉलिसी नाही ती व्हावी.

एफपीओत सहभागी शेतकऱ्यांचा इन्कम टॅक्स बाहेर करावे. मोठ्या प्रकल्पासाठी कर्ज घेताना शेतकऱ्यांना अनंत अडचणी येतात. नाबार्डने याकडे लक्ष पुरवावे. अनुदानासाठी घातली जाणारी मर्यादा योग्य नाही. एक देश एक लायसेन्स, कमीत कमी कागदपत्रात मिळण्याची व्यवस्था करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

डॉ. आखरे म्हणाल्या, की राज्यातील चारही विद्यापीठांनी जवळपास ३००० एमओयू करून सीड उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यामध्ये जवळपास ४०० एफपीओ सहभागी आहेत. या एफपीओनी सीड चैन तुटणार नाही याची काळजी घ्यावी.

काळे म्हणाले, की ट्रूथफुल बियाणे ऐवजी प्रमाणित बियाणेच शेतकऱ्यांना मिळावे. ज्वारीच्या चांगल्या वाणाचे संशोधन करा, शिवाय व्हायरस येणार नाही अशा भाजीपाला पिकांची वान विकसित करण्याची अपेक्षाही शेतकऱ्यांनी यानिमित्ताने केली.

डॉ. परोडा म्हणाले, की शेतकऱ्यांपर्यंत चांगले बियाणे पोहोचायलाच हवे. त्यासाठीची तपासणी व्यवस्था उत्तम असावी. याकरिता धोरणात सुधारणा काय हवी हे शोधण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाणाऱ्यांनीही काही बाबी समजून घ्यायला हव्या. यावेळी ॲड. अमोल रणदिवे व डॉ. मोटे यांनी विचार व्यक्त केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT