PM Narendra Modi Agrowon
ॲग्रो विशेष

PM Narendra Modi : शेतकरी सशक्त होऊन देशाच्या प्रगतीचा नायक बनावा : मोदी

Agriculture Update : सरकारने सिंचन प्रकल्प, नदीजोड, सूक्ष्म सिंचन, पीकविमा, शेतकऱ्यांना आर्थिक मदत अशा विविध पातळ्यांवर काम सुरू केले.

Team Agrowon

Akola News : महाराष्ट्र हे कापूस उत्पादक राज्य म्हणून ओळखले जाते. या कापूस प्रक्रिया उद्योगासाठी सुविधा वाढविण्यावर भर आहे. सरकारने सिंचन प्रकल्प, नदीजोड, सूक्ष्म सिंचन, पीकविमा, शेतकऱ्यांना आर्थिक मदत अशा विविध पातळ्यांवर काम सुरू केले. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविताना खर्च कमी करीत आहोत. देशातील शेतकरी सशक्त होऊन देशाच्या प्रगतीचा नायक बनावा, असे प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

पश्‍चिम विदर्भातील महायुतीच्या सुमारे १५ उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी ते बोलत होते. सभेला महायुतीच्या घटक पक्षांचे नेते प्रफुल्ल पटेल, रामदास आठवले, खासदार अनुप धोत्रे यांच्यासह इतर उपस्थित होते.

पंतप्रधान पुढे म्हणाले, ‘‘सरकारने जे सिंचनाचे प्रकल्प सुरू केले होते ते महाविकास आघाडीने थांबवले होते. जेव्हापासून महायुती आली तेव्हापासून सिंचन प्रकल्पांना पुन्हा गती मिळाली आहे. वैनगंगा-नळगंगा-पैनगंगा नदीजोड प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे अमरावती-यवतमाळ-अकोला-बुलडाणा-वाशीम-नागपूर-वर्धा या जिल्ह्यांतील पाणी समस्या दूर होईल.

यावर ९० हजार कोटी रुपये खर्च केले जात आहेत. नद्या जोडल्याने पूर, दुष्काळ ही संकटे दूर होतील. पाणी समस्या दूर होऊन उत्पादनही वाढेल. कमी पाण्यात उत्पादन काढण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहोत. सरकार राबवत असलेल्या योजनांचा पुढील पाच वर्षांत अधिक परिणामकारकता दिसून येईल.

विदर्भाने भाजपला नेहमीच साथ दिली आहे. महाराष्ट्रातील जनतेची राजकीय समज व दूरदृष्टीमुळे या राज्याच्या सेवेचे सुख वेगळे आहे, असे सांगत आता केंद्रात भाजप सरकार येऊन पाच महिने झाले असून, या काळात लाखो करोडोंच्या योजना सुरू झाल्याचे ते म्हणाले. यात महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचे प्रकल्पही आहेत.

वाढवण बंदराचे भूमिपूजन केले आहे. याची किंमत ८० हजार कोटी एवढी आहे. राज्यातील हे बंदर देशातील सर्वांत मोठे असेल. आपण मागील दोन कार्यकाळात गरिबांना चार कोटी पक्की घरे बनवून दिली.’’ या वेळी राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मनोगत व्यक्त केले. अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी प्रास्ताविक केले.

काँग्रेसवर घणाघाती टीका

आपल्या भाषणात मोदींनी काँग्रेस व गांधी कुटुंबावर टीका करीत ज्या राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येते ते राज्य काँग्रेसच्या शाही परिवारासाठी एटीएम तयार होते. हिमाचल, कर्नाटकसारखी काँग्रेसशासित राज्ये या कुटुंबासाठी एटीएम झालेले आहेत. या राज्यात वसुली दुप्पट होत असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे महाराष्ट्राने सावध राहावे. काँग्रेसला महाराष्ट्र एटीएम बनवू देऊ नका, असेही आवाहन केले.

काँग्रेसने दलित, एसएसी, एसटी, ओबींसींना जातीजातींत विभागून ठेवले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला. जम्मू- काश्मीरमध्ये संविधान लावले, पण यांचे आता पोट दुखत आहे. आपण ३७० कलम हटवले. पहिल्यांदा तेथे संविधानाचे अधिकार मिळाले. पण आता काँग्रेस पुन्हा जम्मू- काश्मीरमधील जनतेला मागे नेण्याचा प्रयत्न करीत आहे, असेही ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Post Monsoon Rain: मॉन्सूनोत्तर पाऊसही सरासरीपेक्षा अधिक

Maharashtra Rain Forecast: राज्यात पावसाला पोषक हवामान

Rain In October 2025 : देशात ऑक्टोबर महिन्यात सरासरीच्या ११५ टक्के पावसाचा अंदाज; राज्यावर पावसाचं सावट

Farmer Union Protest: ओला दुष्काळ, ५० हजार रुपये मदतीच्या मागणीसाठी शेतकरी-शेतमजूर संघटनांचे आयुक्तांना निवेदन

Paddy Harvesting : सिंधुदुर्गात पुन्हा जोरदार पाऊस; भातपीक कापणी रखडली

SCROLL FOR NEXT