Farmers Protest
Farmers Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Protest : खुल्या चर्चेला भाजप नेत्यांची दांडी; शेतकरी मागण्यांवर ७१ व्या दिवशीही ठाम

Aslam Abdul Shanedivan

Pune News : संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाच्या वतीने भाजप आणि एसकेएमच्या नेत्यांना शेतीच्या प्रश्नावर खुल्या चर्चेसाठी आव्हान देण्यात आले होते. मात्र आधी आव्हान स्वीकारणाऱ्या भाजप आणि एसकेएमच्या नेत्यांनी थेट दांडी मारली. यामुळे चंदीगड येथील किसान भवनात शेतकरी नेत्यांना तीन तास वाट पाहिली लागली. यानंतर मंगळवारी (ता. २३) दोन्ही संघटनांनी पत्रकार परिषदेत भाजपसह एसकेएमच्या नेत्यांवर टीका केली आहे. या वेळी जगजितसिंग डल्लेवाल, सुरजितसिंग फूल, अभिमन्यू कोहर, श्रवनसिंग पंढेर आदी उपस्थित होते.

यावेळी गहू पिकावरून शेतकरी नेत्यांनी भाजपसह एसकेएमच्या नेत्यांवर निशाना साधला. नेत्यांनी सांगितले की, १४ ते १८ हजार कोटी रुपये अतिरिक्त खर्च करून संपूर्ण गव्हाचे पीक एमएसपीवर खरेदी केले जाऊ शकते. मात्र तसे सरकारकडून केले जात नाही. २०२२-२३ या कालावधीत देशात एकूण गव्हाचे उत्पादन ११०५.४० लाख मेट्रिक टन झाले होते. त्यातील एफसीआयने फक्त २६२ लाख मेट्रिक टन गहू खरेदी केले. शेतकऱ्यांनी आपल्यासाठी ४०५.५१ लाख टन कुटुंबासाठी, मजुरांसाठी आणि जनावरांसाठी वापरल्याचा दावा शेतकरी नेत्यांनी केला आहे.

'एफसीआय आणि इतर सरकारी संस्थांनी १०४.४१ लाख टन खरेदी केले. पण आता ३३४.९७ लाख टन गहू शिल्लक असून यातील २० ते २५ टक्के गहू हे एमएसपीच्या खाली विकले जाईल', असे कृषी तज्ज्ञांच्या मत आहे. या गव्हाची किंमत १४ ते १८ हजार कोटी रुपये असल्याचा दावा शेतकरी नेत्यांनी केला आहे. 

स्वामिनाथन आयोगाच्या C2+५०% सूत्रानुसार २०२२-२३ मध्ये १५ पिकांवर एमएसपी न मिळाल्याने शेतकऱ्यांचे सुमारे २ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकरी नेत्यांनी म्हटले आहे. तसेच सरकारने स्वामिनाथन आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करून या नुकसानीची भरपाई करावी, अशी मागणी शेतकरी नेत्यांनी केली आहे. 

तसेच आंदोलनाची पुढची रणनीती सांगताना, २२ मे रोजी या आंदोलनाला १०० दिवस पूर्ण होत आहेत. यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी शंभूसह इतर सीमेवर पोहतील. तर जींद जिल्ह्यातील खतकर गावात तीन शेतकरी सहकाऱ्यांच्या सुटकेसाठी पंचायत घेऊन सुमारे दोन तास मुख्य महामार्ग रोखून धरल्याची माहिती शेतकरी नेत्यांनी दिली. 

यानंतर प्रशासनाने शेतकरी नेत्यांना अनिश खतकर यांची कारागृहात भेट घडवून दिली. या भेटीत शेतकरी नेत्यांच्या विनंतीनंतर आंदोलक शेतकरी अनिश खतकर यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले असून ते ३५ दिवस चालल्याचे शेतकरी नेत्यांनी म्हटले आहे.

हमीभाव कायद्यासह विविध मागण्यांसाठी हरियाणा आणि पंजाबचे शेतकरी १३ फेब्रुवारीपासून आंदोलन करत आहेत. आंदोलक शेतकरी दिल्लीच्या जवळ असणाऱ्या शंभू, खनौरी, डबवली आणि रतनपुरा सीमेवर बसले असून त्यांच्या आंदोलनाचा बुधवार (ता.२४) ७१ वा दिवस आहे. मात्र केंद्र सरकारकडून यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. यादरम्यान शंभू सीमेवर रेल्वे रोको आंदोलन देखील आठव्या दिवशी सुरूच आहे. यामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यासह काहींच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांचे हाट होत आहेत. तर रेल्वेचे आर्थिक नुकसान होत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

SCROLL FOR NEXT