Kisan Sabha Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Kisan Sabha Protest : पीक विमा, अतिवृष्टी मदत, सोयाबीन हमीभाव खरेदीसाठी कृषिमंत्र्याच्या जिल्ह्यात शेतकरी आक्रमक; किसानसभेचा तेलगाव ते बीड मोर्चा

Aslam Abdul Shanedivan

Beed News : राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याच जिल्ह्यात शेतकरी नाराज असल्याचे समोर आले आहे. पीक विमा, अतिवृष्टी मदत, सोयाबीन हमीभाव खरेदीवरून शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर किसानसभेच्या नेतृत्वात सोयाबीन हमीभाव खरेदीसह इतर प्रमुख मागण्यांसाठी तेलगाव ते बीड पायी मोर्चा रविवारी (ता.१३) काढण्यात आला. हा मोर्चा १६ ऑक्टोंबरला बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. तर शेतकरी विरोधी सरकारचा प्रतीकात्मक दशक्रिया विधी करू, असा निर्धार किसानसभेचे नेते जिल्हाध्यक्ष अॅड. अजय बुरांडे यांनी केला आहे.

राज्य सरकारच्या लाडकी बहिण योजनेवरून सरकारवर निशाना साधताना बुरांडे यांनी, सरकारला लाडकी बहीण योजनेंतर्गत लाखो रुपयांचे वाटप करणे शक्य आहे. पण शेतकऱ्यांना हमीभाव देणे शक्य नसल्याची टीका केली आहे. त्यांनी ही टीका तेलगाव ते बीड पायी मोर्चात केली. यावेळी किसान सभेचे मुरलीधर नागरगोजे, काशीराम सिरसाट, दत्ता डाके, जगदीश फरताडे, विठ्ठल लगड उपस्थिती होते.

राज्य सरकार शेतकऱ्यांना हमीभाव देण्यास चालढकल करत आहे. मागील ८ दिवसांपासून शेतकऱ्यांच्या जीवन-मरण्याच्या मागण्यांसंदर्भात किसानसभा तेलगाव येथे आंदोलन करत आहे. मात्र सरकारला या धरणे आंदोलनांची दखल घ्यावी, असे वाटले नाही. सरकारने प्रलंबित मागण्याबाबत देखील विचार केलेला नाही. नैसर्गिक आपत्ती आणि सरकारच्या उदासीन धोरणामुळे राज्यातील शेतकरी मेटाकूटीला आला आहे. याकडे देखील सरकारने दुर्लक्ष केले आहे. सरकार शेतकऱ्याला न्याय देत नसल्यानेच आम्हाला धरणे आंदोलन, मोर्चे काढावी लागत आहेत. तरीही पीक विमा व अनुदान दिले जात नसल्याची टीका, बुरांडे यांनी केली आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी किसान सभेने लढा उभारला असून यामुळेच खरीप २०२३ चा १०३ कोटी रुपयांचा पीक विमा मिळाल्याचा दावा बुरांडे यांनी केला आहे. तर अद्यापही राज्यातील अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत. त्यासाठी देखील ९ ते १२ सप्टेंबर रोजी बीड येथे आंदोलन केले. त्यावेळी प्रशासनाने ३० सप्टेंबरपर्यंत मागण्यांची अंमलबजावणी करू, असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र त्याची अमंलबजावणी केलीच नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा तेलगाव येथे आंदोलन सुरू करावे लागलं आहे. आता तेलगाव ते बीड पायी मोर्चा काढावा लागत असल्याचे बुरांडे यांनी म्हटले आहे.

तसेच सरकराने जर या पायी मोर्चाची दखल घेतली नाही. तर १६ ऑक्टोंबरला शेतकरी विरोधी सरकारचा प्रतीकात्मक दशक्रिया विधी करू. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतीकात्मक १४ वा विधी करू, असाही इशाराही बुरांडे यांनी दिला आहे. शेतकऱ्यांनी, आया-बहिणींनी कोणताही मागणी केलेली नाही. पण शेतकरी सन्मान, लाडकी बहीण या योजनांच्या नावाखाली हजार-दीड हजार रुपयांची भीक सरकार देत असल्याचा घणाघात किसान सभेने केला आहे. शेतकरी सन्मान योजना फक्त शेतकऱ्यांना पुढे करून पिकविमा कंपन्यांची ओटी भरण्यासाठी आणि दलाली खाऊन मलिदा लाटण्यासाठी सुरू केल्याचा दावा बुरांडे यांनी यावेळी केला आहे.

तेलगाव ते बीड पायी मोर्चाच्या मागण्या

१) तेलगाव ते बीड पायी मोर्चा हा सन २०२३ खरीप व रब्बी या दोन्ही हंगामातील वंचित शेतकऱ्यांचा पिकविमा मिळावा.

२) गावनिहाय शेतकऱ्यांची नावे प्रकाशित करून पिकविम्यात पारदर्शकता आणावी.

३) कापूस व सोयाबीनला पाच हजार रुपये अनुदान ई-पिक पाहणीची अट न ठेवता सरसकट द्यावी.

४) सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळावी.

५) महाडीबीटी अंतर्गत विशेष करून ठिबक व इतर विविध योजनांचे बीड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे थकीत हक्काचे अनुदान तातडीने मिळावे.

६) राज्य सरकारने हमीभावातील तफावत भरवून काढत नुकसान भरपाई द्यावी.

७) शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने संपूर्ण सरसकट कर्जमुक्ती करावी.

८) कापसाला दहा व सोयाबीनला सात हजार रुपये भाव द्यावा, अशी मागणीही किसान सभेच्या अॅड. अजय बुरांडे यांनी केली आहे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Rabbi 2025 : तेलबिया पिकांसाठी भावांतरचा पर्याय तर कडधान्याची खरेदी वाढवा; कृषी मूल्य व किंमत आयोगाची शिफारस

Crop Loan : पीककर्जासाठी सीबिल धोरण बदला

Tractor Market : येवल्यात १५० वर ट्रॅक्टरची खरेदी

Orange Crop Damage : संत्रा नुकसानग्रस्तांसाठी १३४ कोटींची मागणी

Soybean Market : नांदेड जिल्ह्यात १७ ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्र

SCROLL FOR NEXT