Alibag News: परतीच्या पावसाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला असून, सुरू झालेल्या थंडीमुळे आंबा कलमांना मोहोर येण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. .सध्या अलिबाग परिसरातील बागांमध्ये आंब्याच्या झाडांना मोठ्या प्रमाणात मोहोर डोकावू लागला आहे.यंदा लांबलेल्या पावसामुळे ‘ऑक्टोबर हीट’ फारशी जाणवली नाही. पाऊस थांबल्यानंतर हवामान निवळले आहे..Mango Production: सातपुड्यात मुबलक आंबा उत्पादनाची अपेक्षा .दरम्यान, लांबलेल्या पावसामुळे बागायतदारांना फवारणी करता आली नाही. त्यामुळे काही कलमांवर करपा आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तथापि, सध्याचे हवामान आंबा कलमांच्या वाढीसाठी अत्यंत पोषक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे..Mango Season: पावसामुळे सिंधुदुर्गात आंबा हंगाम महिनाभर लांबणार.मेपर्यंत दर्जेदार पीक आंबा पिकाला दोन टप्प्यांत मोहोर येतो. नोव्हेंबर महिन्यात सुमारे २० टक्के पालवी आलेली असते. सुमारे ८० टक्के कलमांना सध्या पालवी फुटलेली असून, थंडी कायम राहिल्यास या झाडांना जानेवारीपर्यंत चांगला मोहोर येण्याची शक्यता आहे..परतीच्या पावसाचा फटकासकाळच्या वेळेत हवेत गारठाही जाणवू लागला आहे. अलिबागचा हापूस हा राज्यात सर्वात आधी बाजारात दाखल होणारा आंबा म्हणून ओळखला जातो, मात्र यंदा परतीचा पाऊस उशिरा झाल्याने मोहोर येण्यास थोडासा उशीर होईल, असा अंदाज बागायतदारांनी व्यक्त केला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.