Wild Boar
Wild Boar Agrowon
ॲग्रो विशेष

Wild animal Attack On Crop : पिकांच्या रक्षणार्थ शेतकऱ्यांचे शेतातच ठाण

Team Agrowon

Wild animal Attack Kolhapur News : शाहुवाडी तालुक्यातील जंगली प्राण्यांचा अधिवास धोक्यात असल्याने हे वन्यप्राणी मानवीवस्तीकडे कूच करता असल्याचे चित्र आहे. शेतीच्या राखणीसाठी रात्र माचावर काढावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्या वन्यप्राणी, वादळी वारा व विजांचा जिवाला धोका आहे.

शाहूवाडी तालुक्यातील खोतवाडी, मसाई पाठारपासून ते उदगीरी जंगल पट्टयातील शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांपासून पिके वाचवण्यासाठी जीव धोक्यात टाकून पहारा द्यावा लागत आहे.

वन विभाग लाखो रुपये खर्च करून जंगलातील पाणवठे, तळी या द्वारे वन्यजीव प्राण्यांसाठी पाण्याचे व्यवस्थापन करत आहे. पण हे काम सक्षमपणे होते का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

कारण जर जंगलातील प्राण्यांना जंगलात पाणी मिळाले असते तर हे प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीच्या व शेतीच्या दिशेने आले नसते, अशा भावना शेतकऱ्यांतून व्यक्त होते आहेत.

जिवंत पाण्याचे झरे, पाणवठ्यांचे संवर्धनातील त्रुटी यामुळे वन्यप्राणी पाण्यासाठी मानवीवस्तीकडे येत आहेत. वन विभागाकडून प्रत्येक वर्षी लाखो रुपये खर्च करून जंगलातील पाणवठे, पाण्याचे उगम स्रोत, वाटा, नाले, चरी अशी अनेक कामे केली जातात.

पाऊस पडला की या कामांची निशानी राहत नाही, असा सवालही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे.

एकंदर याचा फटका शेतीला होत असून शेतकऱ्यांना पिकाच्या रक्षणासाठी रात्र-रात्र शेतात थांबावे लागत आहे. याबाबत वन विभागाशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद न दिल्याने संपर्क होऊ शकला नाही.

आम्हाला पिकाच्या रक्षणासाठी रात्रभर शेतात माचावर पहारा द्यावा लागत आहे. वन्य प्राण्यांना जंगलातच चारा, पाणी उपलब्ध झाले तर ते शेकऱ्यांना त्रास देणार नाहीत. जंगलातील अन्नसाखळी सक्षम केली तर शेतकऱ्यांना असा त्रास कमी होईल.
उत्तम गुरव, शेतकरी, शित्तुर ता. शाहुवाडी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : दोन दिवस पावसाचा जोर राहणार; राज्यात ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला

Crop Loan Distribution : तीन हजार कोटींच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट

Tur Farming : तूर पिकाकडे वाढतो शेतकऱ्यांचा कल

Amarvel Control : सामूहिक प्रयत्नांमधूनच अमरवेल नियंत्रण शक्य

Food Distribution System : अन्नधान्य वितरणासाठी राज्य, केंद्र शासनाच्या योजना

SCROLL FOR NEXT