Banana Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Farming : केळी बागेत रासायनिक निविष्ठांच्या किमान वापरावर भर

Fertilizer Use : जळगाव जिल्ह्यातील धानोरा (ता. चोपडा) येथे नारायण पाटील यांची ४० एकर शेती आहे. जमीन काळी कसदार व मध्यम प्रकारची आहे. केळी प्रमुख पीक असून त्यात नवती किंवा मृग बहर व कांदेबाग लागवड असते.

Team Agrowon

Shetkari Noyojan :

शेतकरी नियोजन
पीक ः केळी

शेतकरी ः नारायण श्यामा पाटील
गाव ः धानोरा प्र.अडावद, ता. चोपडा, जि. जळगाव
एकूण क्षेत्र ः ४० एकर
केळीखालील क्षेत्र ः १४ एकर (२० हजार झाडे)

जळगाव जिल्ह्यातील धानोरा (ता. चोपडा) येथे नारायण पाटील यांची ४० एकर शेती आहे. जमीन काळी कसदार व मध्यम प्रकारची आहे. केळी प्रमुख पीक असून त्यात नवती किंवा मृग बहर व कांदेबाग लागवड असते. मृग बहर केळीची दरवर्षी जून किंवा जुलै महिन्यांत, तर कांदेबाग लागवड ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये केली जाते. लागवडीसाठी ग्रॅण्ड नैन वाणाच्या कंदांचा उपयोग केला जातो. ग्रॅण्ड नैन या वाणाचे उत्पादन दर्जेदार व निर्यातक्षम असल्याने या वाणास विशेष पसंती दिली जाते असे नारायणराव सांगतात.


केळी लागवड पाच फूट बाय पाच फूट या अंतरावर सरीमध्ये केली जाते. सिंचनासाठी एका ओळीत एक लॅटरल टाकली जाते. कापूस पिकाचे उत्पादन घेतल्यानंतर ते क्षेत्र चार महिने रिकामे ठेवून चांगले तापू दिले जाते. खोल नांगरणी करून जमीन चांगली भुसभुशीत केली जाते. त्यानंतर एकरी तीन ट्रॉली प्रमाणे चांगले कुजलेले शेणखत शेतात पसरले जाते. लागवडीनंतर साधारण सातव्या महिन्यात निसवण सुरू होते. अकरा महिन्यांत पूर्ण बागेतील काढणी पूर्ण होते. रासायनिक कीडनाशके, विद्राव्य खतांचा कमीत कमी वापर करून दर्जेदार केळी उत्पादन घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अनेक वर्षे गुणवत्तापूर्ण केळीचे उत्पादन घेत आहे. दर्जेदार केळीला चांगले दरही मिळतात. या केळीस बाजारात किंवा खरेदीदारांकडून चांगली मागणीदेखील असते.

व्यवस्थापनातील बाबी ः
- मागील वर्षी डिसेंबर महिन्यात कांदेबाग केळीची लागवड केली होती. सध्या या बागेत निसवण सुरू आहे.
- सात एकरांमध्ये फेब्रुवारीत उशिराची कांदेबाग लागवड केली आहे. सात एकरांत सुमारे १० हजार झाडे आहेत. ही लागवड दोन टप्प्यांत करण्यात आली आहे. त्यामुळे बाजारातील जोखीम टाळण्यास मदत होते. तसेच या महिन्यात नवती लागवडीस सुरुवात केली आहे. ही लागवडदेखील सात एकरांत असून त्यातही १० हजार झाडे आहेत.
- केळी ११ महिन्यांचे पीक असल्याने जमिनीचा पोत टिकविणे महत्त्वाचे असते. त्यासाठी कांदेबाग केळी बागेत शेणखताच्या वापरावर भर दिल्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत होते. तसेच सेंद्रिय कर्ब स्थिर राहतो. शिवाय पिकातील फुटवे, सुकलेली पाने काढून ती बागेतच टाकली जातात. त्या माध्यमातून सेंद्रिय कर्ब वाढीसाठी प्रयत्न केले आहेत.

कांदेबाग व्यवस्थापन ः
- कांदेबाग लागवडीत उगवणी चांगली होण्यासह खोडकिडींची समस्या टाळण्यासाठी विद्राव्य खते व शिफारशीत कीडनाशकांची आळवणी करण्यावर भर देण्यात आला. तसेच बुरशीनाशकांची फवारणी देखील घेतली. रासायनिक खतांमध्ये १९ः१९ः१९ या खताचा उपयोग केला. कंदांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव होऊन कंद समस्या होण्याची शक्यता असते. परंतु योग्य व्यवस्थापन करून ९५ टक्क्यांवर उगवण प्राप्त केली होती.
- सुरुवातीलाच पिकात प्रति एक हजार झाडांना तीन गोण्या सिंगल सुपर फॉस्फेटची मात्रा दिली. त्यानंतर नंतर पीक एक महिन्याचे झाल्यावर रासायनिक खतांचे बेसल डोस दिले. प्रति एक हजार झाडांना तीन गोण्या १०ः२६ः२६, पोटॅश एक गोणी आणि एक गोणी युरिया याप्रमाणे खतमात्रा दिली.
- मुळांच्या वाढीसाठी पीक एक महिन्याचे झाल्यानंतर ह्युमीक ॲसिडचा ड्रीपद्वारे वापर करण्यात आला.
- रासायनिक खतांचा दुसरा बेसल डोस अडीच महिन्यांनंतर देण्यात आला. त्यातही प्रति एक हजार झाडांना तीन गोण्या १०ः२६ः२६, एक गोणी युरिया व एक गोणी पोटॅशची मात्रा दिली. तिसरा बेसल डोस बाग पाच महिन्यांची झाल्यावर झाडांना
मातीची भर दिल्यानंतर दिला. त्यात प्रति एक हजार झाडांना एक गोणी १९ः१९ः१९ चा वापर केला.
- बागेची चांगली वाढ होत होती. त्यामुळे बाग निसवणीच्या अवस्थेत येईपर्यंत विद्राव्य खते बागेस दिली नाहीत.
- बाग निसवल्यानंतर प्रति एक हजार झाडांना १५ दिवसाआड १३ः०ः४५ हे खत ड्रीपमधून देण्यास सुरुवात केली.
- बाग सध्या निसवण अवस्थेत आहे. बागेत दर १० दिवसांनी फुटवे व पाने काढून घेण्याचे काम सुरू आहे. पावसाळ्यात निसवणीला गती मिळावी, बागेत हवा खेळती राहावी यासाठी स्वच्छता ठेवण्यावर भर दिला आहे.
- काढलेले फुटवे बागेमध्येच पसरले जातात. त्यामुळे जमीन सुपीकतेला फायदा होतो.

नवीन लागवड ः
- फेब्रुवारी महिन्यात लागवड केलेल्या बागेची साडेचार फूट वाढ झाली आहे. या बागेत साधारपणे सप्टेंबर महिन्यापासून निसवण सुरू होईल. या बागेत देखील रासायनिक खतांचे काटेकोर व्यवस्थापन करण्यावर भर दिला आहे. तसेच फुटवे काढणे, तणनियंत्रण आदी कामे करून घेत आहे.
- सध्या पाऊस पडत असल्याने सिंचन बंद केले आहे. आवश्यकतेनुसार पाऊस नसल्यास वाफसा स्थितीचा अंदाज घेऊन सिंचन केले जाईल.

आगामी नियोजन ः
- या महिन्यात केळी बागांमध्ये खत व्यवस्थापनावर भर देण्यात येईल. यात सेंद्रिय व रासायनिक खतांचा संतुलित वापर केला जाईल.
- बाग एक महिन्याची झाल्यानंतर प्रतिएकर हजार झाडांना युरिया एक बॅग, तीन बॅग १०.२६.२६, एक बॅग पोटॅश व एक बॅग युरिया एवढे खत दिले जाईल. त्यानंतर लगेच खते मातीआड केली जातील. कारण खते उघडी राहिल्यास त्यांचा झाडांना व्यवस्थित उपयोग होत नाही.
- खते दिल्यानंतर पाऊस नसल्यास लागलीच सिंचनाची गरज पाहून सिंचन केले जाईल. बाग वाफसा स्थिती कायम राहील, एवढेच पाणी बागेला दिले जाईल.
- बागेत शिफारशीत खते व कीडनाशकांची नियमित आळवणी केली जाईल.
- कीड-रोगांच्या प्रादुर्भावासाठी बागेचे सतत निरीक्षण केले जाईल. निसवण सुरू असलेल्या बागेतील फुटवे व पाने काढून बागेत स्वच्छता राखली जाईल. फुटव्यांमुळे मुख्य झाडाची वाढ कमी होते तसेच घडाच्या वाढीस फटका बसतो. त्यामुळे ही कार्यवाही केली जाईल.
- निसवलेल्या बागेत दर १५ दिवसाआड १३ः०ः४५ या खताची मात्रा दिली जाईल.

- नारायण पाटील, ९८२२८८६७६७
(शब्दांकन ः चंद्रकांत जाधव)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Injustice: शेतकरी नावडे सर्वांना

Illegal Agri Inputs: अवैधतेचे गुजरात मॉडेल

Vidarbha Irrigation Project: विदर्भातील १३ सिंचन प्रकल्प रद्द

Land Acquisition Law: भूसंपादन कायद्यातील बदलाबाबत सरकार गंभीर

BG II Cotton: ‘वनामकृवि’ कडून कपाशीचे सरळ वाण बीजी II मध्ये परिवर्तित

SCROLL FOR NEXT