New Delhi News : केंद्र सरकार व केंद्रीय जल आयोगाने कर्नाटक राज्य सरकारच्या अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या निर्णयाबाबत कठोर भुमिका घेऊन या निर्णयास स्थगिती देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी येथे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील व केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष डॉ. मुकेश कुमार सिन्हा यांच्याकडे केली.
कर्नाटक राज्य सरकार अलमट्टी धरणाची उंची ५२४.२५६ मीटरपर्यंत वाढविण्याचे नियोजन करत आहे. या निर्णयामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा, वारणा, दूधगंगा व पंचगंगा नदीकाठच्या गावांना मोठा फटका बसणार आहे.
सांगली, कोल्हापूर व कर्नाटक सीमाभागातील बेळगाव व बागलकोट जिल्ह्यांतील पाणलोट क्षेत्रात असणारी जमीन पुराच्या पाण्याखाली जाणार असून नागरी वस्तीलाही याचा फटका बसणार आहे. या पार्श्वभूमीवर श्री शेट्टी यांनी ही मागणी केली.
याबाबत केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष डॉ. मुकेश कुमार सिन्हा म्हणाले, की कर्नाटक राज्य सरकारकडून अशा प्रकारचा अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा कोणताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही.
तसा प्रस्ताव आल्यास याबाबतचा सखोल अभ्यास करून कर्नाटक व महाराष्ट्र राज्य सरकार यांच्याशी व विविध तज्ज्ञांशी बोलून स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून पुरामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची दक्षता जल आयोगाकडून घेतली जाईल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.