Almatti Dam : अलमट्टीची उंची वाढवण्यास स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्राकडे मागणी

Raju Shetti : माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील व केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष डॅा. मुकेश कुमार सिन्हा यांना निवेदन दिले आहे.
Almatti Dam
Almatti Damagrowon
Published on
Updated on

Kolhapur Flood : कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत केंद्राकडे अलमट्टी प्रशासनाने परवानगीसाठी कागदपत्रांची पुर्तता करण्यास सुरूवात केली आहे. अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास पुन्हा पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा धोका बसणार आहे. याला विरोध म्हणून माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील व केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष डॅा. मुकेश कुमार सिन्हा यांना निवेदन दिले आहे. नवी दिल्ली येथे राजू शेट्टी यांनी केंद्रीय मंत्र्यांची गुरूवार (ता.१६) भेट घेतली.

याबाबत केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष डॅा. मुकेश कुमार सिन्हा म्हणाले की, "कर्नाटक राज्य सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा कोणताही प्रस्ताव अद्याप आला नाही. तसा प्रस्ताव आल्यास याबाबतचा सखोल अभ्यास करून कर्नाटक व महाराष्ट्र राज्य सरकार यांच्याशी व विविध तज्ञांशी बोलून स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून पुरामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची दक्षता जल आयोगाकडून घेतली जाईल". अशी माहिती सिन्हा यांनी दिली.

शेट्टी यांनी दिलेल्या निवेदनानुसार 'कर्नाटक राज्य सरकार अलमट्टी धरणाची उंची ५२४.२५६ मीटरपर्यंत वाढविण्याचे नियोजन करत आहे. या निर्णयामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा, वारणा, दुधगंगा व पंचगंगा नदीकाठच्या गावांना मोठा फटका बसणार आहे. सांगली, कोल्हापूर व कर्नाटक सीमाभागातील बेळगांव व बागलकोट जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात असणारी जमीन पुराच्या पाण्याखाली जाणार आहे. याचा नागरी वस्तीलाही याचा फटका बसणार आहे'.

'आंबोलीपासून ते महाबळेश्वरपर्यंत जवळपास २२० किलोमीटर सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पडणारा पाऊस हा अनेक उपनद्यांच्या माध्यमातून शिरोळयेथील कृष्णा नदीत येतो. कृष्णा नदीचा प्रवाह संथ असल्याने महापुरात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पुर परिस्थीती नियंत्रणात येण्यास जवळपास १५ ते २० दिवस लागतात.' अशी माहिती निवेदनाद्वारे दिली आहे.

Almatti Dam
Raju Shetti : सात-बारा कोरा करण्याचे आश्‍वासन पूर्ण करा अन्यथा; राजू शेट्टींचा सरकारला इशारा

'जर कर्नाटक सरकारने अलमट्टीची उंची वाढविल्यास सध्यापेक्षाही कृष्णेच्या पाण्याचा वेग कमी होवून महापूर काळात जवळपास ३५ ते ४० दिवसानंतर पूरपरिस्थिती नियंत्रणात येईल. यामुळे सांगली, कोल्हापूर व कर्नाटक सीमाभागातील शेती, व्यापार, उद्योग, आरोग्य व अर्थकारणावर मोठा परिणाम होणार आहे.' अशी माहिती निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com