Sugarcane Season  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : पुसद तालुक्यातील ऊस उत्पादकांची हेळसांड

Sugarcane Harvesting : दर वर्षी ऑक्टोबरच्या प्रारंभी मोळी पूजन करून गाळप हंगाम सुरू करणाऱ्या कारखान्यांनी या वर्षीच्या हंगामात शासनाच्या अध्यादेशामुळे सुमारे दीड महिना उशिरा गाळप सुरू केले.

Team Agrowon

Yavatmal News : दर वर्षी ऑक्टोबरच्या प्रारंभी मोळी पूजन करून गाळप हंगाम सुरू करणाऱ्या कारखान्यांनी या वर्षीच्या हंगामात शासनाच्या अध्यादेशामुळे सुमारे दीड महिना उशिरा गाळप सुरू केले. परिणामी पुसद तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सध्या मोठी हेळसांड होत आहे.

विधान सभेच्या निवडणुका नोव्हेंबरच्या शेवटी घोषित करण्यात आल्या. मतदानाच्या टक्क्यात फरक पडू नये तसेच उसतोड मजुरांचे होणारे स्थलांतर लक्षात घेता शासनाने सर्व साखर कारखान्यांना गाळप हंगाम निवडणुका झाल्यानंतर सुरू करण्याचे अध्यादेश काढले.

यामुळे पुसद तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऑक्टोबर महिन्यात लागवड केलेला ऊस अद्याप गाळपास गेला नाही. नोव्हेंबर तसेच त्या पुढील महिन्यात लागवड केलेला ऊस अद्याप गाळपाअभावी शेतात उभा आहे. तालुक्यातील ऊस हा महागाव तालुक्यातील गुंज येथील नॅचरल शुगर तसेच पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखन्याद्वारा भैरवनाथ शुगर्स लिमिटेड या दोन कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात येतो.

या वर्षीच्या गळीत हंगामासाठी दोन्ही साखर कारखाने जोमाने ऊस गाळपास लागले आहेत. परंतु शासनाने निवडणुकीअगोदर गाळप हंगाम सुरू करण्यास परवानगी नाकारल्याने कारखान्याची तोड यंत्रणा विस्कळीत झाल्याने साखर कारखान्याला याचा फटका बसत आहे. दोन्ही साखर कारखाने सद्यःस्थितीत पूर्ण क्षमतेने गाळपास लागले आहेत.

परंतु उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे तसेच प्रत्येक शेतकऱ्याला ऊस गाळपास पाठविण्याची घाई होत असल्यामुळे साखर कारखान्यांना तोड यंत्रणा राबविणे अवघड होऊन बसले आहे. शासनाने गाळप हंगाम लांबविल्याने आता शासनानेच साखर कारखान्यांना सर्व ऊस उत्पादकांचा ऊस गाळपास नेण्यासाठी बाध्य करावे व उशिरा ऊस गाळपास नेल्यामुळे वजनात येणारी घट लक्षात घेऊन ऊस उत्पादकांना अतिरिक्त मोबदला द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

‘नॅचरल शुगर’ आघाडीवर

चालु गळीत हंगामात गुंज येथील नॅचरल शुगर कारखाना शिस्तबद्ध पद्धतीने गाळप करीत असून तीन लाख टन ऊस गाळप केले आहे. कार्यक्षेत्रात उभ्या असलेल्या उसाचे क्षेत्र लक्षात घेता कारखाना पाच ते साडे पाच लाख टनांवर उसाचे गाळप करील, असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. तर पोफाळी येथील भैरवनाथ शुगर्सने एक लाख टन उसाचे गाळप केले असून कारखाना हंगाम संपेपर्यंत तीन लाखांच्या जवळपास उसाचे गाळप करील, असा अंदाज आहे. तुर्तास तरी नॅचरल शुगर कारखाना सर्वच बाबतीत आघाडीवर दिसून येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dr Chanda Nimbkar: गोवंश हत्या बंदी कायदा गोसंवर्धनासाठी मारक

Smartphone Usage: स्मार्ट फोनचा भस्मासुर

Tomato Pest Management: टोमॅटोवरील पिनवर्म विषयी दक्ष राहूया...

Success Story: पूरक उद्योगातून सक्षम झाल्या महिला

Halloween Decor: अमेरिकेत भरतो हॅलोविन महोत्सव

SCROLL FOR NEXT