Sugar Mill Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Rate : खानदेशात ऊस दरांबाबत उत्सुकता

Sugarcane Season : खानदेशात नंदुरबार ऊस लागवडीत आघाडीवर आहे. तसेच जळगाव व धुळ्यातही ऊस पीक बऱ्यापैकी असते. मागील हंगामात गाळप वेळेत झाले.

Team Agrowon

Nandurbar News : जिल्ह्यात पुढील महिन्यात ऊसतोडणी सुरू होईल. परंतु दर अपेक्षित नसतात. गुजरातमध्ये उसाला चार हजार रुपये प्रतिटनपेक्षा अधिकचे दर काही कारखान्यांनी जाहीर केले असून, यानुसार खानदेश किंवा पश्चिम खानदेशात ऊस दरांची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

खानदेशात नंदुरबार ऊस लागवडीत आघाडीवर आहे. तसेच जळगाव व धुळ्यातही ऊस पीक बऱ्यापैकी असते. मागील हंगामात गाळप वेळेत झाले. अन्य पिकांत जोखीम वाढल्याने खानदेशात अनेक गावांतील असंख्य शेतकऱ्यांनी या वर्षीदेखील मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड केली आहे.

ऊस तोडणी यंदा लांबणार आहे. यात राज्यासह नजीकच्या गुजरात, मध्य प्रदेशात काही कारखान्यांनी ऊसदर जाहीर केले आहेत. यातुलनेत खानदेशात ऊस दरांबाबत स्पष्टता नाही. किमान चार हजार रुपये प्रतिटन दरांची अपेक्षा खानदेशात शेतकरी व्यक्त करीत आहेत.

खानदेशात गेल्या पाच वर्षांपासून खांडसरी तसेच कारखाने यांच्याकडून उसाला योग्य तो हमीभाव मिळत नसल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त करण्यात आली आहे. या वर्षी उसाला योग्य हमीभाव जाहीर करावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे. अजूनही पावसाळा सुरू आहे. पुढे ऊसगाळप सुरू होईल.

खानदेशात नंदुरबारातील शहादा, नवापूर, धुळ्यात शिरपूर, जळगावात चोपडा, चाळीसगाव आदी भागात अधिकचे उत्पन्न देणारे पीक म्हणून उसाची लागवड आपापल्या शेतात करीत असतात. पपई, केळी आदी पिकांना पर्याय म्हणून तालुक्यातील शेतकऱ्यांकडून उसाला प्राधान्य देण्यात येते. ऊस हे बारमाही पीक असून, त्याला मोठ्या प्रमाणात खत, उसाचे महागडे बियाणे, लागवडीचा खर्च, निंदणी, ठिंबक सिंचन आदी खर्च येतो.

त्यातच महागाई वाढली असून, याचा फटका सहन करावा लागत आहे. रासायनिक खतांचे दर वाढले आहेत. डिझेल, पेट्रोलचे दर वाढल्याने मशागतीचा खर्चदेखील दीडपटीने वाढला आहे. रासायनिक औषधांची तीच तऱ्हा आहे. असे असताना उसाला मिळणारा दर मात्र तोकडा असतो. प्रतिकूल हवामान, अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण आदी नैसर्गिक घटक शेतकरी बांधवांच्या अडचणीत वाढ करीत आहेत. आता पावसाने अडचणी तयार झाल्या आहेत. ऊस उत्पादनावर परिणाम होईल, अशी स्थिती आहे.

किमान चार हजार रुपयेचा दर मिळावा

शेतकऱ्यांनी अनेकदा उत्पादन खर्चावर आधारित ऊस दरांची मागणी केली आहे. पण दखल कारखाने व प्रशासन घेत नाही. शेतकरी अडचणीतही न खचता मोठ्या जोमाने शेतात राबत असतो. मागील पाच ते सात वर्षांपासून उसाचा दर १७०० ते २६०० यातच अडकला आहे. मात्र ऊस उत्पादनाचा खर्च अनेक पटीने वाढला आहे.

याचाही विचार आणि अभ्यास होणे आवश्यक असल्याचे मत ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. तसेच एफआरपीच्या नावाखाली उसाला योग्य तो हमीभाव मिळत नाही. चालू वर्षाच्या गळीत हंगामात उसाला किमान चार हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिकचा प्रतिटन हमीभाव मिळावा, अशी अपेक्षा ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT