Kolhapur Monsoon 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Rain : कोल्हापुरातील पिके पाण्यातच

Team Agrowon

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांचे पाणी कुर्मगतीने ओसरत आहे. पाऊस थांबून दोन दिवस झाले तरी पंचगंगा नदी अजूनही धोका पातळीवर वाहत आहे. सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत पंचगंगा नदीची पातळी राजाराम बंधाऱ्याजवळ ४६ फुटांवर होती. अजूनही धोका पातळीपेक्षा तीन फूट अधिक उंचीवरून नदी वाहत आहे. शहरासह जिल्ह्यातील अनेक भाग थोडे थोडे करून पाण्याखालून मोकळे होत आहेत.

कृष्णा व वारणा नद्यांचे पाणी ओसरण्याचा वेग ही अत्यंत धिमा आहे. सोमवारी (ता. २९) सकाळी संपलेल्या गेल्या चोवीस तासांत या दोन्ही नद्यांच्या पाणीपत्रात केवळ दोन ते तीन इंचांनीच घट झाली. यामुळे निर्माण झालेली परिस्थिती अजूनही कायम आणि गंभीर आहे.

पाऊस थांबूनही पाणी गतीने ओसरत नसल्याने चिंता व्यक्त होत आहे. कृष्णा नदीचे पाणी काही ठिकाणी वाढत आहे. तर काही ठिकाणी पाणी कमी होत आहे, अशी स्थिती कोयना नगर ते नृसिंहवाडी पर्यंतच्या बंधाऱ्यावर आहे.

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतांशी शेती ही पाण्याखाली असून नुकसानीची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत पावसाचा जोर काहीसा ओसरला हीच काय ती समाधानाची बाब आहे.

सोमवारी दुपारपर्यंत राधानगरी धरणाचे २ दरवाजे अजूनही सुरू आहेत. सोमवारी दुपारपर्यंत जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये थांबून थांबून हलक्या स्वरूपात पाऊस सुरू होता. तर पूर्व भागातील अनेक तालुक्यांमध्ये ढगाळ हवामान व ऊनही पडल्याचे चित्र होते.

प्रशासनाने पूरग्रस्त भागातील काही शाळांना सुट्ट्या देऊन तेथे पूरग्रस्तांची सोय केली आहे. आतापर्यंत वीस हजार हेक्टरहून अधिक शेती पाण्याखाली आहे. आणि जास्त दिवस शेतात साचल्याने खरीप पिकांचे पूर्ण नुकसान अटळ बनले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

अलमट्टीतून विसर्ग घटविला

अलमट्टी धरणातून २५ हजार क्युसेकने विसर्ग घटवला आहे. धरणाच्या खालच्या भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. यामुळे विसर्ग कमी केल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.

धरण व्यवस्थापनाने शनिवारी (ता. २७) रात्रीपासून अलमट्टी धरणातून तो ३ लाख २५ क्युसेकने केला होता. धरणात अलमट्टी धरणात पाण्याची आवक २ लाख ७१ हजार ३८६ क्युसेकने होत आहे. अलमट्टी धरणातून २५ हजार क्युसेकने विसर्ग कमी केला असून ३ लाख क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. धरणात ६७.८६ टीएमसी पाणीसाठा आहे.

कोयनातून ३२ हजार क्युसेकने विसर्ग

कोयना धरणातील कोयना ७१, नवजा ६७ व महाबळेश्वर ९३ मिलिमीटर पाऊस झाला असून धरणात प्रतिसेकंद ३८,०१४ क्युसेक आवक होत आहे. धरणाच्या सांडव्यातून ३०,००० व पायथा वीज गृहातून २१०० असा एकूण ३२,१०० क्युसेक विसर्ग नदीपात्रात केला जात आहे. तसेच धोम-बलकवडी १४००, कण्हेर ४७६१, तारळी ५६६२ क्युसेक विसर्ग सुरू आहे. प्रमुख धरणांत ७० टक्क्यांवर पाणीसाठा झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar MSP : इथेनॉलसह साखरेच्या एमएसपीत वाढ करण्याच्या हालचाली

Banana Rate : केळीला ३२०० रुपये कमाल दर

Potato Production : शिरदाळ्यात बटाटा उत्पादनात घट

pH Level of Water : कीडनाशकांच्या लेबलवर नमूद राहील पाण्याचा सामू

Onion Rate : नगरमध्ये कांदा प्रति क्विंटल ५२०० रुपये

SCROLL FOR NEXT