Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : दीड लाख हेक्टर पिकांना फटका

Rain Crop Damage : मॉन्सूनच्या सुरू असलेल्या जोरदार घोडदौडीमुळे राज्यात आतापर्यंत ३१४ तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे.

मनोज कापडे

Pune News : मॉन्सूनच्या सुरू असलेल्या जोरदार घोडदौडीमुळे राज्यात आतापर्यंत ३१४ तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. दरम्यान, पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचे क्षेत्र आता १.३८ लाख हेक्टरच्या पुढे गेले आहे.

सुमारे दीड लाख हेक्टरहून अधिक पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे प्रशासनाकडून सुरू आहे. यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

पीक नुकसानीच्या ताज्या अहवालानुसार, पावसाचा फटका बसल्यामुळे पिकांची नासाडी झालेल्या जिल्ह्यांची संख्या आता २५ पर्यंत आली आहे. पंधरवड्यापूर्वी राज्यातील भात उत्पादक शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत होते.

आता काही भात उत्पादक तालुक्यांमध्ये अतिपाऊस होत असून, उघडीप व्हावी, अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. सिंधुदुर्गमधील सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ, वैभववाडी, देवगड, मालवण, कणकवली, वेंगुर्ला तालुक्यांतील १४४० हेक्टरवरील भात पीक नष्ट झाले आहे.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, अतिवृष्टीत रायगडमधील तीन हजार हेक्टरवरील भातशेती वाहून गेली आहे. यात अलिबाग, मुरुड, महाड, श्रीवर्धन, पेण, खालापूर, रोहा, पोलादपूर, सुधागड, तळा, माणगाव, उरण, कर्जत भागांतील भातखाचरांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यात देखील २३१ हेक्टरवरील भाताचे नुकसान झाले आहे.

सांगली भागात अतिपाऊस, पूर परिस्थितीमुळे साडेआठ हजार हेक्टरवरील भात, ऊस, सोयाबीन, नाचणी, भुईमूग आणि भाजीपाला शेतीचे नुकसान झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतीच्या नुकसानीचा आकडा आता २७ हजार हेक्टरच्या आसपास पोहोचला आहे.

यंदा सरासरीपेक्षा जास्त पेऱ्याचा अंदाज

राज्यात गेल्या ५७ दिवसांमध्ये पडलेला एकूण पावसाचा आकडा आता ६८६ मिलिमीटरपर्यंत गेला आहे. पूर्ण पावसाळ्यात राज्यात सरासरी एकूण पाऊस १०७५ मिलिमीटर होतो. त्यापैकी यंदा आतापर्यंत ६४ टक्के पाऊस झालेला आहे. विशेष म्हणजे जुलैत ३० दिवस सतत पाऊस पडला आहे.

जुलैत पडणाऱ्या एकूण पावसाच्या तुलनेत १४१ टक्के पाऊस गेल्या तीन दिवसांत पडला आहे. दमदार पावसामुळे एकूण खरीप पेरा आता १३४ लाख हेक्टरच्या पुढे गेला आहे. राज्याचे सरासरी खरीप क्षेत्र १४२ लाख हेक्टर आहे. मात्र, यंदा सरासरीपेक्षा जास्त पेरा होण्याचा अंदाज आहे.

१०३ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

राज्यात दीड कोटींहून अधिक शेतकऱ्यांनी पिकाचा विमा उतरवला आहे. २९ जुलैअखेर विमाधारकांची संख्या १५५ लाखांच्या पुढे गेली होती. यामुळे एकूण १०३ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्र विमा संरक्षित झालेले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Protest EU : फ्रान्समधील शेकडो शेतकरी दुसऱ्यांदा ट्रॅक्टर घेऊन पॅरिस शहरात शिरले; आंदोलन तीव्र होण्याची चिन्हे

Basmati Rice Price: इराणमधील संघर्षाचा बासमती निर्यातीवर परिणाम, दरात घसरण

Agriculture Ministry : कृषी मंत्रालयाने तीन योजनांचे एकत्रिकरण करण्याचा दिला प्रस्ताव; राज्यांना मुल्यांकनानुसार मिळणार निधी?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी हप्त्याला स्थगिती; निवडणूक आयोगाचा राज्य सरकारला झटका

Women Empowerment: मकरसंक्रांतीला महिला बचत गटांच्या कर्तृत्वाची गोड चव

SCROLL FOR NEXT