Cotton  Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Market : कापूस ८ हजार होणार ? कापसाची विक्री मार्चे, मे महिन्यात ठरू शकते फायदेशीर

Cotton Rate : आपण मागच्या एक महिन्यापासून चर्चा करत होतो, की फेब्रुवारीत कापूस बाजारातील चित्र दोन गोष्टींमुळे बदलू शकतं.

Team Agrowon

Pune News : आपण मागच्या एक महिन्यापासून चर्चा करत होतो, की फेब्रुवारीत कापूस बाजारातील चित्र दोन गोष्टींमुळे बदलू शकतं. आता कापसाच्या भावात तेजी येण्याला आता सुरुवात झाली. कारण कापसाचे भाव क्विंटलमागं २०० रुपयांनी वाढले.

आता पुढील महिनाभरात कापसाचा भाव ७ हजार ५०० रुपयांचा टप्पा गाठू शकतो. तर मे महिन्यापर्यंत कापूस ८ हजारांच्याही पातळीवर पोहचू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

देशातील कापसाचे भाव पुढील महिनाभरात सध्याच्या भावावरून किमान १० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात. मग सध्याचा भाव किती आहे? तर आजचा भाव आहे सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार २०० रुपये. आता पुढील महिनाभरात सध्याच्या भावावरून १० टक्के म्हणजेच किती तर ६०० ते ७०० रुपये.

म्हणजेच पुढच्या महिनाभरात कापूस ७ हजार ५०० रुपयांचा टप्पा गाठण्याची दाट शक्यता आहे. तर मे महिन्यापर्यंत कापसाचा भाव किमान ७५ टक्क्यांनी वाढू शकतो. म्हणजेच सध्या भावात किमान १ हजार ते १२०० रुपयांची वाढ होऊ शकते, असा अंदाज आहे. 

आता तुम्ही म्हणाल सरकारच काय? भाव वाढले तर सरकार आयात नाही का करणार? पण एका गोष्ट लक्षात घ्यावी. ती म्हणजे कापूस आयात यंदा एवढी सोपी राहणार नाही. सरकारने आयातशुल्क काढले तरीही. कारण आपल्या कापसाचे भाव सध्या किती आहे ६ हजार ८०० ते ७ हजार २०० रुपये.

पण जर आपल्याला सध्या भारतात कापूस आयात करायची असेल तर कापसाचा भाव पडतो ८ हजार ५०० रुपये. म्हणजेच आपल्या कापसाच्या भावापेक्षा किमान १५०० रुपये जास्त आहे. त्यावर ११ टक्के शुल्क वगळेच. सध्याचे ११ टक्के शुल्क गृहीत धरले तर हा भाव ९ हजार ३५० रुपये होतो. मग देशातच स्वस्त कापूस मिळत असताना कोणता व्यापारी आयात करणार? 

शेतीमाल बाजार अभ्यासक राजेंद्र जाधव यांनी राॅयटर्समध्ये बातमी दिली होती की फेब्रुवारी महिन्यात ४ लाख गाठी कापूस निर्यातीचे करार झाले. म्हणजेच भारत तब्बल दोन वर्षानंतर एवढा कापूस एका महिन्यात निर्यात करणार आहे. चीन, बांगलादेश आणि व्हिएतनाम भारताकडून जास्तीत जास्त कापूस खरेदी करत आहेत.

चीनने आधी अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी केला आहे. आता अमेरिकेच्या कापसाचे भाव वाढले. त्यामुळे चीन भारताकडे वळला. चीनने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात भारतातून ३ लाख गाठी कापूस आयातीचे करार केले आहेत. तर मार्च महिन्यातही भारतातून ३ लाख गाठी कापूस निर्यात होऊ शकतो, असा अंदाज काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

तसचं काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतूल गणात्रा यांनीही सांगितले की भाराताचा कापूस सध्या जगात स्वस्त आहे. त्यामुळे कापूस निर्यातीला चांगली मागणी आहे. आतापर्यंत चालू हंगामात १४ लाख गाठी कापूस निर्यात होईल, असा अंदाज होता. पण आता भारतातून २० लाख गाठी कापूस निर्यात शक्य आहे, असेही गणात्रा यांनी सांगितले. तर काही निर्यातदारांच्या मते निर्यात २५ लाख गाठींपर्यंतही वाढू शकते. 

आता तुम्ही म्हणाल, भाववाढ होणार हे ठिक आहे. पण कापसाची विक्री कशी फायदेशीर ठरू शकते? तर सध्या खूपच कमी शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे. कारण बहुतांशी शेतकऱ्यांनी कापूस विकला. पण ज्यांच्याकडे कापूस आहे ते आपला कापूस दोन किंवा तीन टप्प्यात विकू शकतात. मार्च आणि मे महिन्याच्या दरम्यान कापूस विक्री फायदेशीर ठरू शकते, असा अंदाजही अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापसाचे भाव चार कारणांमुळे वाढणार आहेत. महत्वाचं कारण म्हणजे यंदा घटलेले उत्पादन, तसेच बाजारातील कमी जाणारी आवक आणि कापड उद्योगाकडून वाढत जाणारा उठाव. जागतिक बाजारात आपला कापूस स्वस्त असल्याने निर्यातही वाढणार आहे. यामुळे कापूस भाव पुढील महिनाभरात १० टक्क्यांनी आणि मे महिन्यापर्यंत १५ टक्क्यांनी वाढत जाणार आहे. 
राजेंद्र जाधव, शेतीमाल बाजार अभ्यासक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Alampatti Dam: कर्नाटकने अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये : मुख्यमंत्री

Ajit Pawar: विनंती करतो, जनतेला हेलपाटे मारण्यास लावू नका: अजित पवार

Indian Politics: देशात पैसा, तंत्रज्ञान भरपूर; पण कमतरता इमानदारांची: नितीन गडकरी

Gorakshak Terror: गोरक्षकांच्या दहशतीमुळे हजार कोटींचा फटका?

Kharif Crop Insurance: खरीप पीकविमा अर्जासाठी १४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

SCROLL FOR NEXT