Water Storage Agrowon
ॲग्रो विशेष

Water Problem In Parbhani : परभणी जिल्ह्यातील चारठाणा, जोगवाडा, बेलखेडा लघु तलाव कोरडे

Water Issue : वाढते तापमान, बाष्पीभवन,बेसुमार उपसा यामुळे परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील चारठाणा, जोगवाडा, बेलखेडा या ३ तलावांतील पाणीसाठा संपल्यामुळे ते कोरडे पडले आहेत.

Team Agrowon

Parbhani Water News : वाढते तापमान, बाष्पीभवन,बेसुमार उपसा यामुळे परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील चारठाणा, जोगवाडा, बेलखेडा या ३ तलावांतील पाणीसाठा संपल्यामुळे ते कोरडे पडले आहेत.

उपयुक्त पाणीसाठा संपुष्टात आल्यामुळे पेडगाव, आंबेगाव, टाकळगाव, कोद्री, चिंचोली, आडगाव, केहाळ, मांडवा, दहेगाव या ९ लघु तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. उर्वरित लघु तलवांमध्ये सरासरी १३ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. कोरडे पडलेल्या तलावांवंर अलंबून असललेल्या गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

गेल्या काही दिवसात परभणी जिल्ह्यातील कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. वेगाचे वारे वाहत आहेत. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. विविध कारणांसाठी बेसुमार उपसा सुरु आहे. परिणामी जिल्ह्यातील विविध प्रकल्पाच्या तसेच सिंचन स्रोतांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे.

त्यात नखातवाडी (ता.सोनपेठ) येथील तलावात २ टक्के, देवगाव (ता. जिंतूर) येथील तलावात ३ टक्के, वडाळी (ता. जिंतूर) येथील तलावात ८ टक्के, कवड (ता. जिंतूर) येथील तलावात ७ टक्के,पिंपळदरी (ता.गंगाखेड)येथील तलावात १८ टक्के, भोसी (ता. जिंतूर) येथील तलावात २२ टक्के, पाडाळी (ता. जिंतूर ) येथील तलावात १५ टक्के पाणीसाठा होता.

२ लघु तलावात २६ ते ५० टक्के पाणीसाठा होता. त्यात तांदुळवाडी (ता. पालम) येथीलतलावाात २८ टक्के व राणीसावरगााव (ता. गंगाखेड) तलावात ४० टक्के पाणीसाठा होता. केवळ झरी (ता. पाथरी) येथील लघु तलावात ७५ टक्के पाणीसाठा होता.

कोरड्या पडलेल्या तलांवामध्ये जोगवाडा, चारठाणा, बेलखेडा (सर्व ता. जिंतूर) या तलावांचा समावेश आहे. जोत्याखाली पाणीसाठा गेलेल्या तलावात पेडगाव (ता. परभणी),आंबेगाव (ता. मानवत), चिंचोली, आडगाव, केहाळ मांडवा, दहेगाव (सर्व ता. जिंतूर), टाकळगाव,कोद्री (दोन्ही ता. गंगाखेड) हे तलावात आहेत.

गतवर्षी (२०२२) याच तारखेला लघुतलावांत सरासरी १०.५४८ दलघमी (२५ टक्के) उपयुक्त पाणीसाठा होता. जिल्ह्यातील दोन मध्यम प्रकल्पात सरासरी २८ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता.

त्यात करपरा (ता. जिंतूर) मध्यम प्रकल्पांमध्ये २५ टक्के तर मासोळी (ता. गंगाखेड) येथील मध्यम प्रकल्पात ३१ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. गतवर्षी (२०२२) याच तारखेला मध्यम प्रकल्पात सरासरी २४ टक्के पाणीसाठा होता.

पाणीसाठा असा...

जिल्ह्यातील २२ लघु तलांवात मागील आठवड्यात सरासरी ५.९७१ दलघमी पाणीसाठा होता. त्या घट होऊन गुरुवारी (ता.२५) सरासरी ५.६२६ दलघमी (१३ टक्के) पाणीसाठा शिल्लक राहिला होता. जिल्ह्यातील ७ लघुतलावांत ० ते २५ टक्के पाणीसाठा होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shibu Soren Dies: झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक शिबू सोरेन यांचे निधन

Pulses Antinutrients : उडीद, हरभरा, मुगामधील प्रतिपोषक घटकांचे नियंत्रण

Tipeshwar Wildlife Sanctuary : टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यासाठी भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध

Seaweed: पीक पोषणासाठी समुद्री शेवाळ अर्क

Krishi Seva Kendra Bbhandara : भंडारा जिल्ह्यातील ४ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

SCROLL FOR NEXT