Cashew Orchard Fire Agrowon
ॲग्रो विशेष

Cashew Orchard Fire : आंबा आणि काजूची झाडे जळून खाक

Team Agrowon

Ratnagiri News : तालुक्यातील बेनगी, शेडेकरवाडी परिसरात लागलेल्या वणव्यामध्ये आंबा आणि काजूची झाडे जळून खाक झाली असून, बागायतदार शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. बागांमधून गेलेल्या वीजवाहिन्यांचे स्पार्किंग झाल्यामुळे वणवा लागल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे.

काही दिवसांपूर्वी शहरालगतच्या शीळ परिसरात वणवा लागलेला असताना आता बेनगी आणि शेडेकरवाडी परिसरात लागलेल्या वणव्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंबा व काजू बागायतींचे नुकसान झाले आहे.

यामध्ये शेडेकरवाडीतील वासंती वारीशे, प्रकाश पावणाक, गीता शेडेकर, सूर्या पावणाक, संतोष पावणाक, साधना वारीशे, दीपक शेडेकर, राधिका वारीक, अनिता शेडेकर, पार्वती शेडेकर, रामचंद्र शेडेकर, द्रौपदी शेडेकर, गणपत शेडेकर व बापू पावणाक तर बेनगी येथील सुहास नागले व यशवंत नागले यांच्या बागेतील आंबा व काजूची कलमे जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

या नुकसानीचा तलाठ्यांमार्फत पंचनामा करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर शिवसेना तालुकाध्यक्ष श्री. नागले यांनी नुकसानग्रस्त बागांची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही नागले यांनी संबंधित शेतकऱ्यांना दिली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT