Pollution Panchaganga River agrowon
ॲग्रो विशेष

Pollution Panchaganga River : पंचगंगा नदीपात्रात काळेकुट्ट पाणी, शेती, शेतकरी, पशुधनावर गंभीर परिणाम

Panchaganga River : पंचगंगा नदीतील पाणी रसायनयुक्त आले असून, अत्यंत काळेकुट्ट पाणी आले आहे.

sandeep Shirguppe

Panchaganga River Pollution : पंचगंगा नदी प्रदुषणाच्या विळख्यात सापडल्याने जिल्ह्यातील अनेक गावात समस्या निर्माण होत आहेत. मागच्या माहिन्यापासून जलपर्णीने विळखा घातलेल्या पंचगंगा नदीला काळाकुट्ट दुर्गंधयुक्त पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. जिल्ह्यातील शेतकरी, ग्रामस्थांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कोल्हापूरची मुख्य नदीच दुषीत वाहत असल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याचा सर्वाधिक फटका शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यांना बसत असल्यचे चित्र आहे.

पंचगंगा नदीपात्रात काळेकुट्ट पाणी वाहू लागले आहे. हे पाणी शेतीबरोबर ग्रामस्थ, जनावरांसाठी धोक्याचे असून, नदीत रसायनयुक्त पाणी सोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. गेल्या आठवड्यात शिरोळ येथे या दूषित पाण्यामुळे लाखो मासे मृत्यूमुखी पडले होते. असे असताना सध्या नांदणी (ता. शिरोळ) येथे पंचगंगा नदीतील पाणी रसायनयुक्त आले असून, अत्यंत काळेकुट्ट पाणी आले आहे. त्यामुळे नांदणी, धरणगुत्तीकरांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

कोल्हापूर येथून पंचगंगा नदी प्रदूषणाला सुरुवात होते. गांधीनगर, वळीवडे, रुकडी, चिंचवाड, माणगांव, रुई, चंदूर, इचलकरंजी, इंगळी, पट्टणकोडोली, शिरदवाड, अब्दुललाट, हेरवाड, तेरवाड, कुरुंदवाड, टाकडे, शिरढोण, नांदणी, धरणगुत्ती, शिरोळ ते नृसिंहवाडी येथे कृष्णा नदीत संगमापर्यंत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. शिवाय इचलकरंजी परिसरातील प्रोसेसचे रसायनयुक्त काळेकुट्ट सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे.

कोल्हापूर, इचलकरंजी या शहरांबरोबर पंचगंगा नदीकाठावरील असलेल्या गावातून थेट सांडपाणी पंचगंगा नदीत येत असल्याने पंचगंगा नदीतील सर्व जलचर प्राणी मृत पावत आहेत. शिवाय जलपर्णीने नदीतील पाणी प्रदूषित होऊन लाखो मासे मृत पावले आहेत. सध्या इचलकरंजीतील सांडपाणी व प्रोसेसचे थेट रसायनयुक्त पाणी पंचगंगा नदीत मिसळत असल्याने इचलकरंजी ते नृसिंहवाडीपर्यंत पंचगंगा नदीचे पाणी अत्यंत काळे दिसत आहे.

पाण्याला दुर्गंधी येत आहे. शिरोळ तालुक्यातील नांदणी व धरणगुत्ती या गावांना पंचगंगा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. सध्या नदीपात्रात अत्यंत दुर्गंधी व काळे पाणी आल्याने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

ग्रामपंचायतीकडून कूपनलिकांचा ताबा नांदणी येथे पंचगंगा नदीला अत्यंत प्रदूषित पाणी आल्याने नांदणी ग्रामपंचायतीने चार नागरिकांच्या खासगी कूपनलिकेचा ताबा घेतला आहे. यातून पाणी शुध्द करून वॉटर एटीएमद्वारे नागरिकांना प्रत्येक कुटुंबाला २० लिटर पाणी मोफत दिले जात आहे.

सध्या पंचगंगा नदीत दूषित व रसायनयुक्त पाणी आले आहे. हे पाणी शेतीला किंवा जनावरांनाही देण्यालायक नाही. त्यामुळे धरणगुत्ती ग्रामपंचायतीकडून पाच शुध्द पाणी प्रकल्प उभारले आहेत. त्यातून प्रत्येक कुटुंबाला २० लिटर पाणी मोफत दिले जात आहे. नदीतील पाणी फिल्टर करून खर्चासाठी वापरण्यासाठी दिले जात आहे. वारंवार मागणी करूनही प्रदूषण विभाग कारवाई करीत नाही. शिवाय लोकप्रतिनिधींकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bank Crop Loan: बॅंकांनी पीककर्ज प्रकरणांत सकारात्मकता ठेवावी : जिल्हाधिकारी संतोष पाटील

Maharashtra Sugar Industry: हंगामाच्या ५० दिवसांनंतरही सात कारखान्यांचे दरावर मौन

MPKV MoU Signed: कृषी विद्यापीठाचा ‘कार्डियन करेक्ट’शी करार

Honey Village Scheme: ‘मधाचे गाव’ योजना देणार रोजगाराचा गोडवा

Devendra Fadnavis BJP Victory: भाकीत खरं ठरलं! भाजपचा नवा रेकॉर्ड, किती जागा जिंकल्या?; फडणवीसांनी सांगितली आकडेवारी

SCROLL FOR NEXT