Ahilyanagar News: भाकड पशुधनासाठी सरकारने योजना आणून बाजार भावाप्रमाणे पशुधन खरेदी करावे. शेतकऱ्यांना सध्याच्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी योजना आणली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा शिवआर्मी संघटनेने दिला आहे..संगमनेर येथे काही दिवसांपूर्वी भाकड पशुधनाच्या प्रश्नावर शिवआर्मी संघटनेने प्रांताधिकारी कार्यालयात भाकड पशुधन आणून आंदोलन केले. कुरेशी समाजाने भाकड पशुधनाची खरेदी-विक्री बंद केल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. संकरित गाईंची नवजात वासरांची खरेदी बंद असल्याने निर्जनस्थळी अशी वासरे सोडल्याचे प्रकार घडत आहेत..Farmer's Jal Samadhi Protest : युवा शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वात गोदापात्रात आंदोलन.याबाबत सरकारने योजना आणून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करत ‘शिवआर्मी’ने हा प्रश्न हाती घेतला आहे. संघटनेचे अध्यक्ष दत्ता ढगे यांनी सांगितले, की आम्ही संगमनेरला आंदोलन केले. त्याची सरकारने दखल घ्यावी. गाई वाचवायच्या तर आधी शेतकरी वाचवायचा हवा. गाई वाचवायच्या आणि शेतकरी मारायचा हे धोरण चांगले नाही..Protest For Onion Farmers: कांदा प्रश्नावर संसद परिसर दणाणला; विरोधी पक्षातील खासदारांची निदर्शने.आधीच दुधाला दर नाही, नवजात नर वासरांना दूध पाजणे शक्य नाही, शेतकरी कर्जबाजारी झालाय. भाकड गाय संभाळणे सोपे नाही. भाकड गाईंची खरेदी-विक्री बंद असल्याने शेतकऱ्यांना त्या गाई संभाळाव्या लागत आहेत. भाकड पशुधन संभाळण्यासारखी शेतकऱ्यांची आज परिस्थिती नाही..गाईंच्या कत्तली करा, असे आम्ही म्हणत नाही, मात्र भाकड संगोपनासाठी शासनाने गोशाळांच्या संख्या वाढवाव्यात, भाकड पशुधनाची शासकीय खरेदी केंद्रे सुरू करावीत आणि शेतकऱ्यांना बाजार भावाप्रमाणे भाकड पशुधन खरेदी करून दर द्यावा. तसेच शेतकऱ्यांनी भाकड गाई संभाळाव्यात, असे सरकारला वाटत असेल तर गाईंच्या पालन-पोषणासाठी किमान प्रति गाय २०० रुपये सरकारने द्यावेत, नवजात गोऱ्हे यांना दूध पाजण्यासाठी परवडत नाही..Farmer Protest: देशभरात बुधवारी भूमी हक्क आंदोलन : फोंडे.त्यांना तीन महिने जगण्यासाठी गाईंचे दूध पाजण्याची व्यवस्था करावी. म्हणजे सोडून द्यायची वेळ येणार नाही. सोडलेले गोऱ्हे भविष्यात त्रासदायक वळू तयार होतील. तथाकथित गोरक्षकांचा बंदोबस्त करावा. पांजरपोळात आलेल्या आतापर्यंतच्या जनावरांचे काय झाले, त्याचे ऑडिट झाले पाहिजे..गोरक्षकांनी पकडलेल्या गाई गोशाळेत गेल्या, आतापर्यंत लाखो गाई पकडल्या, त्या गेल्या कोठे, गोरक्षकांची मेहनत जर वाया जात असेल, काय उपयोग, असा सवाल करत या प्रश्नावर आंदोलनाचा इशारा श्री. ढगे यांनी दिला..मुख्यमंत्र्यांनी शब्द देऊन पाळावादत्ता ढगे यांनी सांगितले, की दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. या अडचणीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी भाकड जनावरांसाठी योजना आणण्याचा शब्द द्यावा आणि तो त्यांनी पाळावा. जर या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले तर मुंबईत जाऊन शिवआर्मी संघटनेचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या दालनात एकतरी वळू सोडतील..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.