Water Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : भूजल पातळी खोल चालल्याने पाण्याचे पुनर्भरण आवश्यक

Team Agrowon

Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील जलजीवन मिशनची कामे समाधान कारक आहेत. या कामांना गती द्या, भूजल पातळी खोल जात असलेने पाण्याचे पुनर्भरण करा, असे आवाहन राज्याच्या पाणी व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांनी केले.

मोहोळ तालुक्यातील सारोळे येथील जलजीवन मिशन अंतर्गत रिचार्ज शाफ्ट केलेल्या सात कामांची पाहणी प्रधान सचिव खंदारे यांनी केली.

याप्रसंगी भूजल सर्वेक्षण विभागाचे जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. मुश्ताक शेख, उप अभियंता वसीम शेख, कनिष्ठ भूवैज्ञानिक अनिता बनसोडे उपस्थित होते. मोहोळ तालुक्यातील सारोळे हा भाग टंचाई क्षेत्रात येत आहे.

या पार्श्‍वभूमीवर सारोळे येथे जलजीवन मिशन अंतर्गत पुनर्भरणाची कामे हाती घेण्यात येत आहेत. या कामामुळे स्रोत बळकटीस मदत होत आहे. या विशेष कामांची पाहणी प्रधान सचिव खंदारे यांनी केली.

तत्पूर्वी जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी खंदारे यांचे स्वागत केले. या प्रसंगी कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता गाडेकर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव प्रमुख उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT