Padma Shri Maruti Chitampalli  Agrowon
ॲग्रो विशेष

Maruti Chitampalli Passed Away: अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्यावर सोलापुरात अंत्यसंस्कार

Wildlife Expert Death: वन्यजीव, पक्षी व अरण्य यांच्या जीवनाचे भाष्य करणारे पद्मश्री अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या जाण्याने मराठी साहित्य, पर्यावरण व वन्यजीव अभ्यास क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Team Agrowon

Solapur News: अरण्यऋषी, पद्मश्री मारुती भुजंगराव चितमपल्ली (वय ९३) यांचे बुधवारी (ता. १८) रात्री ७.४५ च्या सुमारास येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. गुरुवारी (ता. १९) त्यांच्या पार्थिवावर रूपाभवानी मंदिर परिसरातील हिंदू स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अक्कलकोट रस्ता येथील त्यांच्या निवासस्थानी सकाळी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. विविध मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. दुपारी साडेबाराच्या सुमारास शासनाच्या वतीने सोलापूर पोलिसांनी सन्मानपूर्वक त्यांच्या पार्थिवावर तिरंगा ध्वज ठेवला. तसेच त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांना मानवंदना ही दिली.

त्यानंतर दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पक्षीशास्त्रज्ञ आणि वन्यजीव अभ्यासक असलेल्या चितमपल्ली यांचे अभयारण्य विकासात मोलाचे योगदान होते. त्यांच्या मागे भावजय, श्रीनिवास व श्रीकांत हे दोन पुतणे, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

चितमपल्ली यांना एप्रिल महिन्याच्या अखेरीस राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मान प्रदान करण्यात आला होता. तो स्वीकारण्यासाठी ते दिल्लीला गेले होते. या प्रवासामुळे त्यांना कमालीचा थकवा जाणवत होता. मागील दहा दिवसांपासून त्यांनी अन्न घेणे बंद केले होते. दिवसभरात ते तीन वेळा दूध घेत असत. बुधवारी सायंकाळी त्यांनी अर्धा ग्लास पाणी प्राशन केले. रात्री पावणेआठच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

सोलापूरच्या गिरणी कामगारांच्या घरात जन्मलेल्या चितमपल्ली यांनी ज्येष्ठ लेखक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षितज्ज्ञ आणि वन्यजीव अभ्यासक म्हणून ख्याती मिळविली. सोलापुरात प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर पुढील व्यावसायिक शिक्षण त्यांनी स्टेट फॉरेस्ट कॉलेज, कोइमतूर आणि बंगळूर, दिल्ली, कान्हा राष्ट्रीय उद्यान (मध्य प्रदेश), डेहराडून येथील संस्थांमधून घेतले.

त्याचबरोबर त्यांनी संस्कृत, जर्मन आणि रशियन भाषांचाही अभ्यास केला होता. त्यांनी वनाधिकारी म्हणून ३६ वर्षे शासनाच्या वनविभागात काम केले. त्यानंतरही ते प्राणी, पक्षी वन्यजीवांच्या अभ्यासासाठी २९ वर्षे जंगलात राहिले. सोलापुरात पार पडलेल्या ७९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी त्यांनी भूषविले. याशिवाय विविध संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन गौरविले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह विविध मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ujani Dam Water Release : 'उजनी'तून 'भीमे'त २० हजाराचा विसर्ग

Plastic Flower Ban : प्लॅस्टिक फूल विक्रीवर शासनाने बंदी घालावी

Urea Shortage : युरीया बनला विक्रेत्यांचीही डोकेदुखी

Fertilizer Smuggling : गोंदियातून मध्य प्रदेशात खतांची तस्करी उघड

Guava Auction : हिमायत बागेतील अतिक्रमण काढल्याच्या परिणामी केंद्राच्या महसुलात वाढ

SCROLL FOR NEXT